दहावीला थेट प्रवेश

दहावीला थेट प्रवेश

पुणे - सहावी ते नववी अपयशी झालेल्या विद्यार्थ्यांना व अकरावी नापासांना यशाची एक नवीन संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने ‘सकाळ विद्या’, ‘सकाळ सोशल फाउंडेशन’ व ‘तेजस विद्यालय’ यांच्यातर्फे मार्गदर्शन कार्यशाळा आयोजिली आहे. 

अनेकांना आर्थिक, शारीरिक आणि कौटुंबिक कारणांमुळे अपयश येते अथवा शिक्षण सोडावे लागते. अशा विद्यार्थ्यांना शिक्षणाचा मार्ग पुन्हा एकदा खुला करण्याच्या उद्देशाने कार्यशाळा होत आहे. वय वर्षे १४ पूर्ण असलेल्या ते ६५ वर्षे वयोगटापर्यंतच्या व्यक्ती, कमीत कमी पाचवी पास असलेले विद्यार्थी, तसेच सहावी ते नववीच्या कुठल्याही इयत्तेत नापास अथवा पास झालेले विद्यार्थी यात प्रवेश घेऊ शकतात. जे विद्यार्थी दहावी उत्तीर्ण आहेत; परंतु त्यानंतर शिक्षण अपूर्ण राहिले अथवा खंड पडला आहे, तसेच अकरावी नापास आहेत, असे विद्यार्थी या विद्यालयामार्फत बारावीला प्रवेश घेऊ शकतात. जे विद्यार्थी दहावी अथवा बारावीला प्रथमच बसत आहेत, त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. नापास विद्यार्थ्यांकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन, शिक्षणाची गरज, अपयश येण्याची कारणे, अपयशाचा विद्यार्थी व पालकांवर होणारा परिणाम, अपयशामुळे खचून न जाता यशाच्या दिशेने वाटचाल कशी करावी, त्याचबरोबर नापास विद्यार्थ्यांमध्ये असणारा न्यूनगंड कमी करून आत्मविश्‍वास कसा वाढवता येईल, यांसारख्या अनेक विषयांवर मार्गदर्शन मिळणार आहे.

हेमलकसाच्या लोकबिरादरीचे सामाजिक कार्यकर्ते अनिकेत आमटे, प्राचार्य विदुला शेटे आणि उपप्राचार्य प्रियांका कुलकर्णी या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील.

 केव्हा - रविवार, ११ जून २०१७
 कधी - सकाळी ११ वा.
 कोठे - टिळक स्मारक मंदिर, टिळक रोड.
 प्रवेश - विनामूल्य 
 नावनोंदणी - www.sakalvidya.com 
 संपर्क - ९८५०९८९२२६ / ९६५७०८३३२६

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com