जुनी सांगवी (पुणे) : पर्यावरण संवर्धन,आरोग्याचा संदेश देत केरळ येथील उमेद हिबिनू हुसेन, महंमद फासील, मोहम्मद शाफी व मोहम्मद जलील या चार मित्रांनी केरळ ते जम्मू-काश्मीर अशा तब्बल चार हजार किलोमीटरचा सायकल प्रवासाला सुरुवात केली. २६ ऑक्टोबर रोजी त्यांनी प्रवासास सुरुवात केली. १४०० किलोमीटरचा प्रवास करून मंगळवारी दुपारी ते पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी येथे दाखल झाले.
येथील वेताळ महाराज सोसायटी येथे सामाजिक कार्यकर्ते युवराज सिंह गायकवाड,गिर्यारोहक सायकलप्रेमी संजय शितोळे व विठाबाई रघुनाथराव शितोळे यांनी सायकलस्वारांचा सत्कार केला. यावेळी आयप्पा मंदिर समितीचे अध्यक्ष राधा कृष्ण नायर, ई के मेनन, एम ए थॉमस, के सी पोंनुकुत्तन, के एन शाशिध्रण नायर, पी ऐन सुधीर, कृष्णा शितोळे, वैभव ठार, सोमनाथ साळुंखे आदी उपस्थित होते.थंडीचे दिवस व भाषेच्या अडचणीमुळे अनेक समस्यांशी सायकलस्वारांना तोंड द्यावे लागत आहे. पंधरा दिवसांचा थकवा, अपुरी झोप यामुळे जुनी सांगवी येथे सायकलस्वारांची जेवणाची, राहण्याची व्यवस्था करण्यात आली.आयप्पा मंदिर समितीच्या वतीने सायकलस्वारांना आर्थिक मदतही करण्यात आली.
पुरेसा आराम व दीड दिवसांचा पाहुणचार घेऊन बुधवार ता.१० सकाळी सात वाजता युवराजसिंह गायकवाड यांनी त्यांना दापोडी-पिंपरी-चिंचवड मार्गे जुन्या मुंबई-पुणे महामार्गांने मुंबईकडे मार्गस्थ केले. पुणे येथून मुंबई मार्गे गुजरात, सुरत, अहमदाबाद, हरियाणा, पंजाब, लुधियाना, पठाणकोट, जम्मू, श्रीनगर असा पुढील मार्ग असेल असे त्यांनी सांगितले.तीन वर्षांपूर्वी केरळ ते काश्मीर असा सायकल प्रवास करायचा निश्चय कलिकट व मलाप्पूरम जिल्ह्यातील अझींजलंम, उत्तर किंनासहेरी, वांडोर नीरानपारबु या ग्रामीण भागातील तरुणांनी केला होता.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.