पुणेकरांचा पाणीसाठा राहणार कायम! 

1Khadakwasala_0.jpg
1Khadakwasala_0.jpg


पुणे : पुणे शहर व परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये मिळून 26 टीएमसी पाणीसाठा असून, शहराला करण्यात येणाऱ्या पाणीसाठ्यात तूर्तास कोणातीही कपात करण्याची शक्‍यता नाही. यासंदर्भात मुंबईत कालवा समितीची बैठक सुरु झाली असून, बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब होईल. 
खडकवासला प्रकल्पातील वरसगाव, टेमघर, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांची क्षमता 29 अब्ज घनफूट (टीएमसी) असून, आज अखेर 26.08 टीएमसी पाणी शिल्लक आहे. या पाण्याचे पुणे आणि परिसरासाठी पिण्यासाठी, शेतीसाठी कालवा समितीच्यावतीने नियोजन होते.
 

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, जलसंपदाचे वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी या बैठकीस उपस्थित आहेत. भामा-आसखेड हा या बैठकीतील महत्त्वाचा विषय आहे. मात्र, पुण्यातील मुठा उजवा कालवा फुटीच्या पार्श्‍वभूमीवर पुण्यातील पाणीवाटप आणि इतर विषयांवरही चर्चा सुरु असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. पुण्यातील पाण्यात कोणतीही कपात होण्याची शक्‍यता नाही. तसा कोणताही प्रस्ताव बैठकी समोर नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

पुण्यातील पाणीसाठ्याबाबत तुमच्या काही सूचना असतील तर webeditor@esakal.com वर कळवा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com