रबाब म्हणजे महाराष्ट्र, पंजाब आणि काश्मीरला जोडणारे वाद्य : गाडगीळ

Rabab is an instrument that connects Maharashtra Punjab and Kashmir syas GadgilRabab is an instrument that connects Maharashtra Punjab and Kashmir syas Gadgil
Rabab is an instrument that connects Maharashtra Punjab and Kashmir syas GadgilRabab is an instrument that connects Maharashtra Punjab and Kashmir syas Gadgil

पुणे : रबाब वाद्यामध्ये तीन महत्वाच्या तीन तारा असतात. त्यातील एक आहे महाराष्ट्र, दुसरा पंजाब आणि तिसरा काश्मीर आहे. म्हणजेच तीन राज्यांना जोडणारे हे वाद्य आहे, असे मत आमदार अनंत गाडगीळ यांनी व्यक्त केले. 

गुरूनानकदेव यांच्या 550 व्या जयंतीनिमित्त सरहद संस्थेने आयोजित केलेल्या भाई मर्दाना राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते. दिग्दर्शक प्राणकिशोर कौल, सरहद संस्थेचे संजय नहार,  संतसिंग मोखा, अर्हम फाऊंडेशनचे डॉ. शैलेश पगारिया, संजीव शहा, युवराज शहा, शैलेश वाडेकर, चरणजित सहानी, सुरेंद्र वाधवा, हरमिंदरसिंग घई, आरपीएस सैगल, यावेळी उपस्थित होते.

पुण्यातील गोल्ड जिमला ग्राहक मंचाचा दणका

काश्मीरमधील रबाबवादक उस्ताद अब्दुल हमीद भट, यावर भट, इश्फाक भट, सलीम जहांगीर, महंमद अल्ताफ भट, महंमद युसूफ यांना भाई मर्दाना राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. काकासाहेब गाडगीळ यांनी पंजाब आणि जम्मू काश्मीरमध्ये राज्यपाल म्हणून केलेल्या कामांची माहिती गाडगीळ यांनी यावेळी दिली. शंकर शंभू कव्वाली म्हणत असतील, ओम तत सत जर बडे गुलाम अली म्हणत असतील, तर हीच भारताची ओळख आहे, असे ते म्हणाले.

पुण्यात मानसी नाईकचा विनयभंग

कौल म्हणाले, "सनाऊल्ला भट हे खूप मोठे कलाकार होते. मोठेमोठे तबलावादक यायचे. त्यांच्याबरोबर वाजवायचे. लयकारीमध्ये त्यांचा हात कुणीच धरू शकत नव्हते. ते काश्मीरमध्ये हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतिक होते. त्यांच्याबरोबर तीन दशके काम करता आले, याचा आनंद आहे. सनाऊल्ला यांनी चाळीस वर्षांपूर्वी आशा भोसले यांना काश्मीर आकाशवाणीवर काश्मिरी गाण्यासाठी रबाबवर साथसंगत केली होती, ते गाणे देशभर गाजले होते."

मोखा म्हणाले, भाई मर्दाना हे मुस्लिम होते. ते नानकदेवांबरोबर शेवटपर्यंत राहिले. देशात धर्म-जातीवरून वाद चालले आहेत, अशा स्थितीत नानकदेव आणि भाई मर्दाना यांच्या गुरु शिष्याच्या नात्यातून संदेश घेतला पाहिजे."

संजय नहार म्हणाले, "गुरु नानकदेव यांचे शिष्य भाई मर्दाना हे त्यांना रबाब साथसंगत करत असत. धर्माधर्मांना जोडण्याच्या प्रयत्न यातून झाला. त्यामुळेच त्यांच्या नावाने हा पुरस्कार देण्याचा उद्देश आहे. सनाऊल्ला भट यांचे घराणे शंभर वर्षांपासून रबाब वादनात आहे. हे वाद्य वादन त्यांनी जिवंत ठेवले. त्यांच्या घराण्यातील वादकांना पुरस्कार देताना आनंद होतो आहे. महाराष्ट्रात रबाब वादन रुजावे म्हणून राष्ट्रीय रबाब अकादमी करण्याचा आमचा मानस आहे."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com