...तर आम्ही आघाडीसोबत जायला तयार : राजू शेट्टी

pune.jpg
pune.jpg

पुणे : भाजपला पराभूत करण्यासाठी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने आमच्या मुद्द्यांना सकारात्मक पद्धतीने प्रतिसाद दिला तर आम्ही आघाडीसोबत जायला तयार आहोत. परंतु हा निर्णय आघाडीने लवकर घ्यावा. उद्यापर्यंत (बुधवार) निर्णय नाही घेतला तर आमचा मार्ग मोकळा आहे, अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला अल्टिमेटम मंगळवारी दिला. हातकणंगलेसह, बुलडाणा व वर्धा या तीन जागांसाठी स्वाभिमानी ठाम असल्याचा पुर्नउच्चार ही त्यांनी यावेळी केला. 

शेट्टी आणि रासपचे नेते महादेव जानकर यांची आज पुण्यात बैठक झाली. त्यानंतर शेतकरी संघटनेच्या सभासदांची बैठक शेट्टी यांनी घेतली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना शेट्टी यांनी हा अल्टिमेटम दिला. शेट्टी म्हणाले, ''राष्ट्रवादीने आमचे काही मुद्दे मान्य केले आहेत. परंतु आघाडीतील दोन्ही पक्षांनी ते मान्य केले पाहिजे. तरच आम्ही आघाडीत जाण्याचा विचार करू. बुलढाण्याची जागा राष्ट्रवादीने सोडावी व वर्ध्याची जागा कॉंग्रेसने सोडावी, असा प्रस्ताव आम्ही ठेवला आहे. माढ्याची जागा शरद पवार यांनी लढण्याची चर्चा आता संपुष्टात आल्याने तेथून आम्हाला संधी दिली, तर आम्ही लढायला तयार आहोत.कारण मागील निवडणुकीत तेथे आम्ही थेट राष्ट्रवादीशी लढत दिली होती. त्यात आमचा निसटता पराभव झाला होता. यामुळे जर ही जागा आम्हाला लढायला दिली तर आम्ही तयार आहोत. कारण आम्ही येथून सहज विजय मिळवू.'' 

रासपचे नेते महादेव जानकराच्या भेटीबद्दल विचारले असता, शेट्टी म्हणाले,"छोट्या पक्षांना मोठ्या पक्षांकडून त्रास देण्याचे प्रयत्न होतच असतात. यामुळे जानकर युतीतून बाहेर पडले व आमचे आघाडीशी जुळले नाही, तर रासप व आम्ही एकत्र लढण्याचाही विचार करू. आमची सोळा जणांची यादी तयार असून आघाडीने सकारात्मक प्रतिसाद नाही दिला तर राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे आम्ही या सगळ्या जागा स्वतंत्रपणे लढायला सज्ज आहोत. केवळ भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी आम्ही आघाडीकडे प्रस्ताव दिला असून ते हा निर्णय सकारात्मकपणे घेतील अशी अपेक्षा आहे.' 

पवारांचा निर्णय विचारांतीच- शेट्टी
''
हातकणंगलेची जागा ही आमचीच आहे, त्यामुळे आम्ही फक्त बुलडाणा व वर्धा या दोनच जागा मागत आहोत. बुलडाणा येथून रविकांत तुपकर व वर्ध्यातून सुबोध मोहिते हे निवडणूक लढवतील,' असेही शेट्टी यांनी सांगितले. तर पवारांच्या माढ्यातील माघारीबद्दल शेट्टी म्हणाले, "शरद पवारांनी राजकारणात पन्नास वर्षे घालवलेली आहेत. त्यामुळे त्यांनी घेतलेला निर्णय नक्कीच विचारपूर्वक असेल. पवारांनी निवडणूक हारण्याच्या भीतीने निर्णय बदलला हे म्हणणे योग्य नाही.' 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com