"राम नदी' जीवनदायिनी बनणार - माधव चंद्रचूड

"राम नदी' जीवनदायिनी बनणार - माधव चंद्रचूड

पुणे - किर्लोस्कर वसुंधरा क्‍लबतर्फे पाणी या विषयावर आम्ही गेली 13 वर्षे काम करीत आहोत. स्थानिक नागरिकांचा सहभाग आणि 12 स्वयंसेवी संस्था यांच्या पुढाकारामुळे राम नदी पुनरुज्जीवन अभियानाला आशेचा किरण प्राप्त झाला आहे. महिनाभरात दहा कृती कार्यक्रम राबविले आहेत, अशी माहिती किर्लोस्कर वसुंधराचे अध्यक्ष माधव चंद्रचूड यांनी दिली. 

महोत्सव संयोजक वीरेंद्र चित्राव, वसुंधरा स्वच्छता अभियानचे अनिल गायकवाड, जीवित नदीच्या शैलजा देशपांडे, बायोस्फिअर्सचे डॉ. सचिन पुणेकर, सागर मित्र, जलबिरादरीचे विनोद बोधनकर, इकॉलॉजिकल सोसायटीचे डॉ. गुरुदास नूलकर, जलदेवताचे शैलेंद्र पटेल, मिशन ग्राउंड वॉटरच्या वैशाली पाटकर, ओकिऑसच्या केतकी घाटे, सीम एज्युकॉलेजचे धर्मेंद्र चव्हाण, पराडकर फाउंडेशनचे जयप्रकाश पराडकर, पर्यावरणतज्ज्ञ ज्योती पानसे आदी उपस्थित होते. 

चंद्रचूड म्हणाले, ""खाटपेवाडी तलावाचे पुनरुज्जीवन हा या अभियानाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. तीस दिवसांतील कामामुळे खाटपेवाडी तलावाची 25 टक्के पाणीपातळी वाढली आहे. जैवविविधतेला धक्का न लागू देता तलावाची स्वच्छता, किनाऱ्यांची फेरआखणी, पायवाटा तयार करणे आदी कामे करण्यात आली. निसर्गाला हानिकारक ठरणाऱ्या परदेशी वनस्पती हटवून स्थानिक वनस्पतींची लागवड, तसेच पक्ष्यांची घरटी आणि अंडी जपण्याची कामे सुरू आहेत.'' 

या सर्व कामात 12 स्वयंसेवी संस्था, दहा हजार महाविद्यालयीन विद्यार्थी आणि किर्लोस्कर समूह यांच्या एकत्रित प्रयत्नांनी उद्दिष्टाकडे वाटचाल सुरू आहे. अभियानातील दहा टक्के काम पूर्ण झाले असून, पुढील तीन वर्षांत नदीचे पुनरुज्जीवन करण्यात येणार असल्याचे चंद्रचूड म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com