भामा आसखेडमधून रब्बी हंगामातील पहिले आवर्तन

भामा आसखेडमधून रब्बी हंगामातील पहिले आवर्तन

आंबेठाण : भामा आसखेड (ता. खेड) धरणातून चालू रब्बी हंगामातील पहिले आवर्तन आज (ता. २१) दुपारी बारा वाजल्यापासून सोडण्यात आले आहे.

एकीकडे चालू वर्षी धरण शंभर टक्के भरल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता तर दुसरीकडे पुणे शहराच्या पूर्व भागाला पाणी जाणार असल्याने पुढच्या पावसाळ्यापर्यंत धरणात पाणी शिल्लक राहिल की नाही ? याची चिंता देखील सतावत आहे. सध्या धरणात ९८.५८ टक्के इतका पाणीसाठा असून मागील वर्षी आजच्या दिवशी धरणात ९९.३६ टक्के पाणीसाठा होता.सुरुवातीला पावसाच्या कमी प्रमाणामुळे मागील वर्षीपेक्षा यावर्षी धरण उशिरा भरले होते.

आज धरणाच्या एक आणि तीन क्रमांकाच्या दरवाजतून पाणी सोडण्यात आले असून त्यासाठी दरवाजे १० सेंमीने उचलण्यात आले आहेत.खेड तालुक्यासह शिरूर आणि दौंड तालुक्याला पाण्याचा फायदा होत आहे. १ जून पासून धरणात १०३४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

भामा आसखेड हे खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील भामा नदीवर उभारलेले मातीचे धरण आहे.धरणाची पाणी साठवण क्षमता ८.१४ टीएमसी इतकी असून धरणात सध्या जिवंत पाणीसाठा ७.५५ टीएमसी इतका आहे.खेड तालुक्यातील आठ बंधारे भरण्यासाठी हे आवर्तन सोडण्यात आले आहे.

धरण प्रशासनाच्या वतीने शाखा अधिकारी बी. आर. खेडकर आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक के. डी. पांडे यांनी नदीकाठच्या गावांनी सावधानता बाळगावी असे आवाहन केले आहे.

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com