पुणे - सेवा पुरवठादाराने केलेल्या फसवणुकीबाबत ग्राहक मंचाने तक्रारदाराच्या बाजूने निकाल दिला. मात्र, निकालांची अंमलबजावणी न झाल्याने नुकसानभरपाईसाठी अनेकांना प्रतीक्षा करावी लागत आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
फसवणुकीच्या तक्रारीबाबत ग्राहकाने सादर केलेले पुरावे आणि त्यावर सेवा पुरवठादार कंपनी किंवा व्यक्तीचे म्हणणे सादर झाल्यावर मंचाचे अध्यक्ष योग्य तो निकाल देत असतात. फसवणुकीमुळे ग्राहकाला झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासापोटी तसेच तक्रारीचा खर्च म्हणून प्रकरणानुसार रक्कम प्रतिवाद्याने ग्राहकाला द्यायची असते. मंचाने निकाल दिल्यापासून ३० ते ९० दिवसांत त्याची अंमलबजावणी होणे अपेक्षित असते. मात्र, सध्या लॉकडाउन असल्याने न्यायालयीन तसेच आर्थिक व्यवहारांवर काही निर्बंध आले आहेत.
तसेच, ज्यांना ग्राहकाला पैसे देण्याची इच्छा नाही अशा प्रतिवादींना ही आयती संधी मिळाली आहे. त्यामुळे जानेवारी ते मार्चअखेरीस झालेल्या अनेक निकालांची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. निकाल होऊनही नुकसानभरपाई मिळत नसल्याने ग्राहकांचे आर्थिक नुकसान होत असून, मानसिक त्रासही सहन करावा लागत आहे.
कलम २५ किंवा २७ नुसार अर्ज आल्यानंतर मंचाकडून पुढील कार्यवाही सुरू होते. तक्रारदार त्यांच्या सोयीने ऑनलाइन किंवा प्रत्यक्षात अर्ज करू शकतात. एक जुलैपासून कामकाज सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विनंती किंवा विविध प्रकारच्या अर्जांवर लवकरच प्रत्यक्षात सुनावणी होईल.
- उमेश जावळीकर, अध्यक्ष, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.