शेतकऱ्यांच्या विकासासाठी नदीजोड प्रकल्प लवकर व्हावा  : डॉ. डी. वाय. पाटील 

Founder-460x612.jpg
Founder-460x612.jpg

पुणे : ''देशातील पाणीप्रश्‍न बिकट झाला असून, तो युद्धपातळीवर सोडविण्याची गरज आहे. शेतकऱ्यांच्या विकासासाठी नदीजोड प्रकल्प झालाच पाहिजे. या प्रकल्पावर कितीही खर्च झाला तरी चालेल पण तो पूर्ण झाल्यास देशात पाण्याचा तुटवडा कधीच भासणार नाही. '', असे मत माजी राज्यपाल डॉ. डी. वाय.पाटील यांनी व्यक्‍त केले. नोबल ऍग्रो फाऊंडेशन आणि शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटनेच्यावतीने मंगळवारी आयोजित पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. 

आमदार विद्या चव्हाण, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल पवार, माजी न्यायाधीश जी. डी. इनामदार, विजय जावंधिया, शामराव देसाई, उत्तमराव शिंदे सरकार, भगवानराव
वैराट आदी यावेळी उपस्थित होते. जावंधिया म्हणाले, ''देशात सत्तेत बदल झाला तरी शेतकऱ्यांची स्थिती बिकट होत चालली आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांना सिंचनाचे पाणी मिळत नाही. शेतकऱ्यांना निसर्गाबरोबरच सरकारशीही लढावे लागते. त्यामुळे शेतकरी 
आत्महत्या करीत आहेत. त्यावर सरकारने उपाययोजना करण्याची गरज आहे.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com