नियम पाळल्यास अपघात टळतील - मिलिंद मोहिते

Milind-Mohite
Milind-Mohite

पुणे - ‘देशात दरवर्षी सुमारे पाच लाख रस्त्यांवरील अपघातांची नोंद होते. सुमारे दीड लाख नागरिकांना प्राण गमवावे लागतात. दरदिवशी जवळपास ४१३ नागरिकांचा मृत्यू अपघाताने होतो. वाहतुकीच्या नियमांचे प्रत्येकाने योग्यरीतीने पालन केल्यास ही जीवितहानी सहज रोखणे शक्‍य आहे,’ असे मत राज्य महामार्गाचे पुणे विभागाचे पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी व्यक्त केले. 

सकाळ सोशल फाउंडेशन, महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसिएशन, महाराष्ट्र ऑर्थोपेडिक सोसायटी यांच्या वतीने महाराष्ट्र ऑर्थोपेडिक दिनानिमित्त ‘रस्त्यावरील अपघातात द्या मदतीचा हात’ या विषयावर कार्यशाळा आयोजित केली होती. या वेळी अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. पराग संचेती, पूना ऑर्थोपेडिक सोसायटीचे अध्यक्ष डॉ. श्रीनिवास शिंत्रे, अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. नीलेश जगताप, डॉ. संजय पाटील, ॲड. संयोगीता गायकवाड या उपस्थित होत्या.

मोहिते म्हणाले, ‘‘सुटीला जाताना स्वच्छंदपणे वाहने चालविणे, महाविद्यालयीन विद्यार्थी नियम तोडून भरधाव वेगाने वाहन चालवितात. त्यामुळे अपघात वाढत आहेत. अनेकदा हेल्मेट वापरणे, सीट बेल्ट 
लावणे हे कमीपणाचे समजले जाते. मात्र, त्यांच्या वापराने अपघातात मोठी इजा न होता प्राण वाचू शकतात.’’

डॉ. संचेती म्हणाले, ‘‘अपघाती व्यक्तींना प्रत्येकाने मदत केली पाहिजे. तसेच या कार्यक्रमातून प्रेरणा घेऊन नागरिकांनी अपघातग्रस्तांना मदत देऊ केल्यास आमचा हा उपक्रम यशस्वी झाला असे समजू.’’ 

या वेळी हाडांची ठिसूळता (बीएमडी) तपासणी करण्यात आली. तसेच चित्रफीत आणि पथनाट्याद्वारे अपघात झाल्यावर रुग्णांना द्यावयाच्या मदतीची माहिती देण्यात आली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com