‘महाराष्ट्र दिनी दिल्लीत साहित्य संमेलन घ्या’

Sanjay-Nahar
Sanjay-Nahar

पुणे - राजधानी दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्याचे दिलेले निमंत्रण रद्द केलेले नाही, असे स्पष्टोक्‍ती पुण्यातील सरहद संस्थेने केली आहे. कोरोनामुळे १ मे, महाराष्ट्र दिनी हे संमेलन दिल्लीमध्ये घ्यावे, त्यासाठी आमची तयारी आहे, असे संस्थेने म्हटले आहे. 

‘सरहद’चे अध्यक्ष संजय नहार यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांना पत्र पाठविले आहे. त्याबाबत त्यांनी निवेदनही प्रसिद्धीस दिले आहे. त्यात म्हटले आहे, की यंदाचे साहित्य संमेलन ३१ मार्चपूर्वी नाशिकमध्ये घेण्याचा विचार अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ करीत आहे. परंतु, कोरोनाचे संकट आटोक्‍यात आले नाही. त्यामुळे एक मे रोजी हे संमेलन दिल्लीत घ्यावे, त्यासाठी आमची तयारी आहे.साहित्य संमेलन ३१ मार्चपूर्वी झाले पाहिजे, असे महामंडळातील काही सदस्यांचे म्हणणे आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

घुमानचे साहित्य संमेलन २०१५ मध्ये एप्रिल महिन्यात झाले होते. दिल्लीतील वातावरणही १५ मेपर्यंत चांगले असते. त्यामुळे या महिन्यात संमेलन तेथे घेणे योग्य ठरेल. मूळचे पुण्याचे पण दिल्लीत वास्तव्यास असलेले अविनाश चोरडिया हे संमेलनाचे प्रमुख आयोजक आहे. त्यांच्या पाठिंब्याने हे संमेलन दिल्लीत करण्याची क्षमता असल्याचे नहार यांनी स्पष्ट केले. पानिपतच्या युद्धाला २६० वर्षे पूर्ण होत आहेत. त्याचे स्मरण करताना महाराष्ट्र दिन योग्य असल्याचे नहार यांनी पत्रकात म्हटले आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com