शिवाजी महाराजांच्या मनातला महाराष्ट्र घडतोय - रामदास आठवले

Ramdas-Athawale
Ramdas-Athawale

कोथरूड - ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सर्वसमावेशक विकास होत असून, समाजात मोठा बदल घडत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनातील महाराष्ट्र आता घडत आहे’, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. 

कोथरूडमधील प्रभाग बारामध्ये साकारलेल्या बुद्धविहार आणि अण्णा भाऊ साठे सभागृहाच्या नूतनीकरणासह ई-क्‍लिनिक, व्यायामशाळा, हनुमान मंदिर, नवीन प्रकाश व्यवस्था, भूमिगत वीजवाहिन्या, अंगणवाडी, महिला उद्योग केंद्र आदी विकासकामांचे लोकार्पण त्यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. 

लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक विष्णू कसबे, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, आरपीआयचे शहराध्यक्ष अशोक कांबळे, संयोजक आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष व नगरसेवक मुरलीधर मोहोळ, परशुराम वाडेकर, नगरसेविका वासंती जाधव, हर्षाली माथवड, अल्पना वरपे, दिलीप वेडे-पाटील, मंजुश्री खर्डेकर आदी उपस्थित होते.

आठवले म्हणाले, ‘आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता म्हणून मला अण्णा भाऊंचे मोठे आकर्षण आहे; मात्र अण्णा भाऊंना मानणारे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारे लोक एकत्र येत नाहीत. वेशीच्या बाहेर राहणाऱ्या सर्वांनी एकत्र यायला हवे. दलित तरुणांनी सैन्यदलात सामील व्हावे. दलित समाजाने मनातील गुलामी काढून टाकत सर्वच क्षेत्रात कामगिरी करावी.’ संयोजक मोहोळ म्हणाले, ‘सर्व घटकांचा सर्वसमावेशक विकास करण्याची भूमिका होती. त्यातूनच विविध कामांना प्राधान्य देत कामे पूर्ण केली आहेत. बुद्धविहार साकारताना आणि अण्णा भाऊ साठे सभागृहाचे नूतनीकरण करताना मनात वेगळे समाधान आहे.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com