देशात सामाजिक असमतोल : कोळसे पाटील 

देशात सामाजिक असमतोल : कोळसे पाटील 

धायरी : "देशात आज श्रीमंत वर्ग हा अधिक श्रीमंत व गरीब हे आणखी गरीब होत आहेत. याबाबत सामान्य माणूस जेव्हा स्वतंत्र विचार करायला लागेल, तेव्हा त्याला अनेक प्रश्न पडतील. त्यानंतर तो अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी पुढे येईल,'' असे प्रतिपादन माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी केले. 

डॉ. सुधाकरराव जाधवर सोशल अँड एज्युकेशन ट्रस्टच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळ्याचे नऱ्हे येथील जाधवर इन्स्टिट्यूटच्या सभागृहात करण्यात आले. या वेळी पाटील बोलत होते. एमआयटीचे कार्यकारी संचालक मंगेश कराड, प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, ऍड. शार्दूल जाधवर, सुरेखा जाधवर आदी उपस्थित होते. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, महावीर जैन विद्यालयाचे सचिव युवराज शहा आणि शिवप्रसाद डोंगरे यांनी या वेळी आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

डॉ. विद्यासागर म्हणाले, ""शैक्षणिक गुणवत्ता ही चांगल्या शिक्षकांवर अवलंबून असते. शिक्षक चांगले नसतील, तर व्यवस्थेत बदल करून उपयोग नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आता चांगल्या शिक्षणाचा आग्रह धरला पाहिजे.'' डॉ. जाधवर म्हणाले, ""विद्यार्थ्यांना चांगल्या शिक्षणाबरोबर त्यांच्यातील कलागुण जोपासण्यासाठी शिक्षण संस्थेकडून प्रयत्न केले जातात. त्यासाठी वर्षभरात विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com