सोमेश्‍वरच्या रिंगणात परिवर्तन पॅनेल

दिलीप खैरे यांची घोषणा; सर्वसामान्यांची सत्ता आणणार असल्याचा दावा
सोमेश्‍वरच्या रिंगणात परिवर्तन पॅनेल
सोमेश्‍वरच्या रिंगणात परिवर्तन पॅनेल

सोमेश्वरनगर : ‘‘सोमेश्वर कारखान्याच्या व्यवस्थापनात एकीकडे काही ठेकेदारांचे वर्चस्व निर्माण झाले आहे, तर दुसरीकडे कारखान्याचे नेतृत्व खासगीकरणाचे पुरस्कर्ते आहे. त्यामुळे जाणीवपूर्वक खासगी कारखान्यांचे भले व्हावे अशा पद्धतीने निर्णय घेतले जातात. हे बदलून सर्वसामान्य सभासदांची सत्ता कारखान्यावर आणण्यासाठी ‘सोमेश्वर परिवर्तन पॅनेल’ लढाईत उतरत आहे,’’ अशी माहिती पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी मुख्य प्रशासक दिलीप खैरे यांनी दिली.

सोमेश्वर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम आजपासून जाहीर झाला. शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी पुरस्कृत ‘सोमेश्वर विकास पॅनेल’ नावाने निवडणूक लढवत असल्याची घोषणा करत आपल्या भूमिका जाहीर केल्या. या पार्श्वभूमीवर खैरे यांनी पत्रकारांशी बोलताना भाजप पुरस्कृत पॅनेलची भूमिका विशद मांडली. याप्रसंगी कारखान्याचे माजी संचालक पी. के. जगताप, बाळासाहेब भोसले, इंद्रजित भोसले, बबलू सकुंडे, नाना गायकवाड आदी उपस्थित होते.

सोमेश्‍वरच्या रिंगणात परिवर्तन पॅनेल
गोंदियात सामूहिक हत्याकांड! तिघांची हत्या करत आरोपीने स्वत:लाही संपवलं

खैरे म्हणाले, ‘‘सभासदांनी तीन वर्षांपूर्वी विस्तारीकरणाला परवानगी दिली होती, परंतु खासगी कारखान्यांना ऊस पळविता यावा म्हणून विस्तारीकरण जाणीवपूर्वक लांबविण्यात आले. आता निवडणुकीच्या तोंडावर ते सुरू आहे. तीन वर्ष शेतकऱ्यांना नाइलाजाने अन्य कारखान्यांना ऊस द्यावा लागला. त्यामुळे सोमेश्वर कारखान्याच्या तुलनेत त्यांना कमी भाव मिळाला. जवळपास २४ कोटी रुपयांचे सभासदांचे नुकसान झाले आहे. शिवाय छत्रपती, माळेगाव व सोमेश्वर हे तिन्ही कारखाने एकाच नेतृत्वाखाली गेल्यामुळे भावाची स्पर्धा संपली आहे. खासगी कारखान्यांचे भावाचे अपयश झाकण्यासाठी व शेजारच्या कारखान्याला सांभाळून घेण्यासाठी सोमेश्वरची परिस्थिती चांगली असतानाही सभासदांना भावात दोनशे-तीनशे रुपये कमी दिले जातात. हा कारभार निवडणुकीत उघड करणार असून, गुजरातच्या धर्तीवर सर्वोत्तम भाव कसा देता येतो, हे दाखवून देण्यासाठी निवडणुकीत उतरलो आहोत.’’

सोमेश्‍वरच्या रिंगणात परिवर्तन पॅनेल
“आजी, माजी..'' नंतर आता सुभाष देसाईंच्या 'त्या' विधानाची चर्चा

अपहार, गैरकारभार याचा स्पर्शही नसणारे चांगले उमेदवार आमच्याकडे आहेत. परिवर्तनासाठी आम्ही सर्वपक्षीय पॅनेल तयार करत आहोत. सत्ताधारी चांगल्या भावाबद्दल पाठ थोपटून घेत असले; तरी मोदी सरकारचे इथेनॉलचे धोरण आणि साखरेला बांधून दिलेला भाव याचेही मोठे योगदान आहे. तसेच, भावात पैसे कसे मारले जातात आणि कंत्राटदारांना कसे जास्त दिले जातात, हे पुराव्यानिशी मांडणार आहे.

- पी. के. जगताप, माजी संचालक, सोमेश्‍वर साखर कारखाना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com