दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल २२.८६ टक्के 

ssc board
ssc board

पुणे - राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल २२.८६ टक्के लागला आहे. या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी ५० हजार ६६७ जण उत्तीर्ण झाले आहेत. मात्र एक लाख १८ हजार १६१ जणांना एटीकेटी सवलत मिळाल्याने ते अकरावी प्रवेशासाठी पात्र असतील. 

मंडळाने जुलै महिन्यात ही फेरपरीक्षा घेतली होती. त्याचा ऑनलाइन निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. राज्यभरातून दोन लाख २१ हजार ६२९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षीच्या निकालात किंचित घट झाली. गेल्या वर्षी या परीक्षेचा निकाल २३.६६ टक्के लागला होता. या परीक्षेतील गुणपडताळणी करायची असल्यास त्यांना ३१ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर या काळात विभागीय मंडळाकडे अर्ज करता येतील. 

खासगी आयटीआयचा पर्याय
दहावीनंतर पदविका अभ्यासक्रम आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची (आयटीआय) प्रवेश प्रक्रिया शुक्रवारी संपली आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमांसाठी त्यांना प्रवेश मिळणार नाही. परंतु खासगी आयटीआयची संस्था स्तरावरील प्रवेश प्रक्रिया १३ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. 

जागा केवळ तीस हजार
सर्व विषयांत उत्तीर्ण झालेले ५० हजार ६६७ आणि एक वा दोन विषयांत अनुत्तीर्ण होऊनही एटीकेटी सवलत मिळालेले एक लाख १८ हजार १६१ असे एकूण एक लाख ६८ हजार ८२८ विद्यार्थी अकरावीच्या प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. मात्र, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये अकरावीच्या सुमारे ३० हजार जागाच रिक्‍त आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com