विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर

Rickshaw
Rickshaw

पिंपरी - शहरातील बहुतांश शाळांच्या विद्यार्थ्यांची स्कूलबस, ऑटो रिक्षातून वाहतूक केली जाते. मात्र, सध्या सहाशे शाळांपैकी तीनशे शाळांमध्ये बस सुरक्षा समितीअभावी या विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर आहे. या शाळांमधून नियम धाब्यावर बसवून प्रवासी क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची ने-आण केली जात आहे. याकडे वाहतूक पोलिसांकडून दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. 

शहरात वाहन क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक नित्याची आहे; पण आता चिमुकल्या विद्यार्थ्यांचीही क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक बस आणि रिक्षांमधून सुरू आहे. मुलांची सुरक्षा, शाळेत त्यांची ने-आण करण्याची व्यवस्था पाहण्यासाठी दरवर्षी आरटीओ व शिक्षण विभागाकडून प्रत्येक शाळेत स्कूलबस सुरक्षा समिती स्थापन केली जाते. या समितीत वाहतूक नियंत्रक पोलिस, शाळेचे मुख्याध्यापक व आरटीओचे अधिकाऱ्यांचा समावेश असतो. त्यांनी दर महिन्याला शाळांमध्ये बैठक घेणे. आवश्‍यक आहे. निम्म्याहून अधिक शाळांमध्ये समिती स्थापली नाही; परंतु याकडे काणाडोळा केल्यामुळे मुलांची कोंबून वाहतूक केली जात आहे. पालक स्मिता शिंदे म्हणाल्या, ‘‘स्कूलबसचे व्यवस्थित शुल्क देऊनही मुलांची अशाप्रकारे वाहतूक केली जाते. शाळा व्यवस्थापनाने यावर नियंत्रण आणणे आवश्‍यक आहे.’’ स्कूलबसचालक हर्षद साळुंके म्हणाले, ‘‘क्षमतेपेक्षा जास्त मुलांची वाहतूक करणे नियमबाह्य आहे; परंतु काही स्कूलबस, रिक्षाचालकाकडे विद्यार्थी संख्या जास्त आहे. त्यामुळे ते तशीच वाहतूक करतात.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com