जुन्नर : दुष्काळ व पाणीटंचाईची परिस्थिती असतानाही श्री विघ्नहर साखर कारखान्याने 196 दिवस गाळप करून जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचे गाळप तर दुसऱ्या क्रमांकाचे साखर उत्पादन केले असल्याची माहिती अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी दिली.
कारखान्याच्या 33 व्या गाळप हंगामाचा सांगता समारंभ आज बुधवार ता. 8 ला झाला. यावेळी उपाध्यक्ष अशोक घोलप, संचालक, ऊस तोडणी कामगार, तोडणी मुकादम, उल्हास सहाणे, माजी सरपंच गंगारामबुवा डुंबरे, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
शेरकर म्हणाले की, यंदाच्या गाळप हंगामात कार्यक्षेत्रात सुमारे 31 हजार 075 एकर ऊस उपलब्ध होता. योग्य नियोजन केल्याने सर्व ऊसाचे गाळप करणे शक्य झाले. केंद्र सरकारने साखरेचे भाव प्रतिक्विंटल 3100 रुपये केले तरीही साखर उचलली जात नाही. त्यामुळे व्याजाचा मोठा भुर्दंड पडत आहे. यामुळे कारखान्याच्या विविध खर्चासाठी रक्कम उपलब्ध करणे अत्यंत जिकरीचे झाले होते. जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचे गाळप करुन दुसऱ्या क्रमांकांचे साखर उत्पादन केल्याबद्दल कामगारांना पंधरा दिवसांचा पगार बक्षिस म्हणून देण्याचे शेरकर यांनी जाहिर केले.
उपाध्यक्ष अशोक घोलप म्हणाले की, गळीत हंगाम अतिशय चांगल्याप्रकारे संपन्न झाला. सर्व घटकांचे योगदान अतिशय मोलाचे लाभले. गळीत हंगामाच्या निमित्ताने संचालक धनंजय डुंबरे व त्यांच्या सुविद्य पत्नी सविता यांच्या उपस्थितीत सत्यनारायण महापुजा झाली. या वर्षात सेवानिवृत्त झालेल्या पंधरा कामगारांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देवून फेटा बांधून सत्कार करण्यात आला. कार्यकारी संचालक राजेंद्ग जंगले यांनी सुत्रसंचालन केले. आभार देवेंद्ग खिलारी यांनी मानले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.