भोरमधील डोंगराचा कडा कोसळलेल्या या गावाबाबत घेतलाय हा निर्णय

kondhari
kondhari

भोर (पुणे) : भोर तालुक्यातील कोंढरी या गावातील डोंगराचा कडा गतवर्षी अतिवृष्टीमुळे कोसळला होता. त्यामुळे  या गावातील रहिवाशांचे कायमस्वरुपी 
पुनर्वसन करण्यासाठी सरकारला पाठविलेल्या प्रस्तावातील त्रुटी दूर करून त्याचा अहवाल सरकारला पुन्हा पाठविण्यात येणार आहे. परंतु, या वर्षी पावसाळ्यात सर्व नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर करण्याची व्यवस्था सरकारकडून करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले. 

जिल्हाधिकारी राम यांनी आमदार संग्राम थोपटे यांच्यासमवेत आज कोंढरी गावच्या नुकसानीची पाहणी केली. त्यावळी त्यांनी माहिती दिली. या वेळी जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील, प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, तहसीलदार अजित पाटील, गटविकास अधिकारी विशाल तनपुरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुर्यकांत क-हाळे, जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे, पंचायत समिती सदस्य रोहन बाठे आदी उपस्थित होते. 
या वेळी आमदार संग्राम थोपटे यांनी कोंढरीतील दुर्घटना झालेल्या घटनास्थळांची माहिती आणि पुर्नवसन अत्यावश्यक असल्याची माहिती जिल्हाधिका-यांना दिली. गतवर्षी ७ ऑगस्टला रात्री कोंढरी गावच्या डोंगराचा काही भाग अतिवृष्टीमुळे कोसळला गेला. प्रशासनाने त्वरित हालचाली करून नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर केल्यामुळे कोणतीही जिवितहानी झाली नाही. मात्र, मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली. 

तत्कालीन मदत व पुर्नवसन राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी भेट देवून कायमस्वरुपी पुर्नवसन करण्याचे जाहीर केले. आमदार संग्राम थोपटे यांनी अधिका-यांसमवेत पु्र्नवसन करण्याच्या जागेची पाहणी केली. प्रशासनाच्या आवाहनानंतर तालुक्यातील अनेक दानशूर व्यक्ती व संस्थांनी कोंढरीच्या ग्रामस्थांना अत्यावश्यक गोष्टीं दिल्या. त्यानंतर तहसीलदार व प्राताधिका-यांनी जिल्हाधिका-यांमार्फत शासनाकडे कायमस्वरुपी पुर्नवसन करण्यासाठीचा प्रस्ताव पाठविला. परंतु, त्यामधील असलेल्या त्रुटींची पूर्तता करून त्याचा अहवाल सरकारकडे त्वरित पाठविला जाणार असल्याचे जिल्हाधिका-यांनी सांगितले. परंतु, तोपर्यंत या वर्षीच्या पावसाळ्यात कोंढरीच्या नागरिकांचे योग्य ठिकाणी तात्पुरते स्थलांतर केले जाणार आहे. 

कोंढरीच्या कायमस्वरुपी पुर्नवसनासाठी आमदार संग्राम थोपटे यांचा नियमीत पाठपुरावा सुरु असल्याचेही जिल्हाधिका-यांनी सांगितले. तसेच, गतवर्षी अतीदक्ष राहून कोंढरीच्या ग्रामस्थांते तात्पुरते स्थलांतर केल्याबद्दल प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव व तहसीलदार अजित पाटील यांच्यासह तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग, पंचायत समिती व कृषी विभागाच्या अधिका-यांचेही त्यांनी कौतुक केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com