'साहित्य संमेलनाला गेलो नाही म्हणून काहीही बिघडले नाही'

'साहित्य संमेलनाला गेलो नाही म्हणून काहीही बिघडले नाही'

पुणे- "मी आजवर कधीही आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला गेलो नाही म्हणून माझं काहीही बिघडले नाही.आता ज्यांनी बहिष्कार टाकला आहे त्यातील काहीजण आजवर तिथं जात होते, मुळात तिथं जाऊन त्यांनी आजवर काय केलं ?आणि आता न जाऊन काय होणार आहे? असा सवाल कादंबरीकार समीक्षक प्रा. जी के ऐनापुरे यांनी 'सकाळ'शी बोलताना विचारला. 

यवतमाळ येथे होणाऱ्या आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात नयनतारा सहगल यांच्या निमंत्रणावरून जे वाद सुरु आहेत त्याविषयी त्यांनी आपली भूमिका व्यक्त केली. 

"भालचंद्र नेमाडे यांच्यासारखा ज्ञानपीठ प्राप्त लेखक तिकडे जात नाही. नामदेव ढसाळ आणि विजय तेंडुलकर तिकडे कधी गेले नाहीत. तिकडे न जाण म्हणजे फार मोठं बंड करतोय असं काहींना वाटतंय पण ते बंड म्हणता येणार नाही. लेखक का लिहितो ?आखिल भारतीय मराठी संमलेनात मिरवण्यासाठी का ?तर मुळीच नाही. मला जे अस्वस्थ करत ते मला मांडावे,लिहावे असे वाटते म्हणून मी लिहितो "असे ते म्हणाले. 

"मराठी साहित्यात गिरणगावं विरुद्ध गिरगावं असा संघर्ष आहे. बहुसंख्य लेखकांना गिरगावच आकर्षण आहे. त्यांनी गिरणगावातच राहून लिहावं. गिरगावची मान्यता कशाला हवी ?ज्यांना गिरगावची मान्यता हवी असं वाटते ते आखिल भारतीयच्या स्टेजवर जातात आणि अशी काहीतरी फुसकी बंडे करून स्वतःला क्रांतिकारक म्हणून घोषित करतात. दरवर्षी वादाच्या भोवऱ्यात सापडणारी संमेलने सुरु कशाला ठेवली आहेत. की संमेलने गाजवीत म्हणून असे वाद मुद्दाम निर्माण केले जातात. सामान्य जनतेला या संमेलनाविषयी कसलाही जिव्हाळा नाही. अशी संमेलने जर बंद केली तर लोकांच्या जीवनावर आणि ज्याला खरोखर लिहायचं आहे त्या साहित्यिकांवर काहीही फरक पडणार नाही. "असं मत त्यांनी व्यक्त केलं.

"नेमाडे ,ढसाळ ,तेंडुलकर यांच्यासारखे लेखक या भपकेबाज साहित्य संमेलनास कधी गेले नाहीत म्हणून त्यांची पुस्तके कोणी वाचत नाही असं घडलं नाही. आणि नारायण सुर्वे यांच्यासारखे कवी तिकडे गेले पण त्यांना त्यांची मूळ भूमिका तिथं मांडता आली नाही ."अशी खंत ऐनापुरे यांनी व्यक्त केली. "आजवर या संमेलनात जी भाषणे झालीत ती सुमार दर्जाची असल्याची टिका त्यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com