गराडे - नारायणपूर (ता. पुरंदर) येथील दत्त मंदिर व श्री नारायणेश्वर मंदिर येथे नारळी पौर्णिमा व स्वातंत्र्यदिनानिमित्त मिळालेल्या सुटीत लाखो भाविकांनी देवदर्शनाचा लाभ घेतला.
दरम्यान, मंदिरात पहाटे अभिषेक करण्यात आला. त्यानंतर नारायण महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आरती, होमहवन, महाआरती झाली. त्यानंतर नारायण महाराज यांच्या आशीर्वादासाठी भाविकांनी रांगा लावून लाभ घेतला. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत मंदिरात भाविकांची गर्दी होती अशी माहिती नारायणपूर दत्त मंदिराचे व्यवस्थापक भारतनाना क्षीरसागर यांनी दिली. तहसीलदार अतुल म्हेत्रे, पंचायत समितीच्या जिल्हा उद्योग व ग्रामीण यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी सुहास कांबळे, बळीराजा शेतकरी संघाच्या राज्याच्या महिला संघटक छाया नानगुडे, दादा भुजबळ, राजू वाघमारे आदी भाविकांनी आरतीचा लाभ घेतला. सासवड ते कापुरव्हळ असे रस्त्याचे काम पावसाळ्यात सुरू असल्यामुळे रस्त्याच्या अडचणीमुळे प्रवाशांना वाहतूक कोंडीला सामना करावा लागला. यात प्रचंड वेळ गेल्यामुळे मानसिक संताप झाला असल्याचे नारायणपूरचे माजी सरपंच रामभाऊ बोरकर यांनी सांगितले. नारळी पौर्णिमा व 15 ऑगस्टच्या सुटीमुळे पुरंदर किल्ला, श्रीनाथ म्हस्कोबा मंदिर कोडीत, चिव्हेवाडी घाटातील पाण्याचा धबधबा, तसेच केतकावळे येथील बालाजी मंदिर असा पर्यटनाचा लाभ भाविकांनी घेतला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.