दर कोसळल्याने शेतकऱ्यांनी टोमॅटो फेकले रस्त्यावर

दर कोसळल्याने शेतकऱ्यांनी टोमॅटो फेकले रस्त्यावर

वालचंदनगर : ऐन दिवाळीत टोमॅटोचे दर काेसळल्याने शेतकऱ्यांना टोमॅटो रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली. त्यामुळे शेतकऱयांचे अताेनात नुकसान होत आहे. 

गेल्या आठवड्यापासून टोमॅटोचे दर कमी होण्यास सुरवात झाली. सध्या टोमॅटोच्या २० किलोच्या कॅरेटला मुंबईतील वाशी मार्केटमध्ये ५० ते ७० रुपयांचा दर मिळत आहे. एका कॅरेटची वाहतुकीसाठी सुमारे ३५ रुपये खर्च येत  असल्याने एका कॅरेटला वाहतुकीचा खर्च वजा केला असता १५ ते ३५ रुपये मिळत आहेत. यामध्ये तोडणीचा खर्चही निघत नसल्याने इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकून देण्यास सुरवात केली.

ऐन दिवाळीत शेतकऱ्यांना टोमॅटो फेकून द्यावा लागत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढत आहेत. तसेच उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांचा तोटा होत आहे. 

दोन टन टोमॅटो दिले फेकून

याबाबत भरणेवाडी (ता.इंदापूर) येथील शेतकरी सतीश गोरे यांनी सांगितले, की माझ्याकडे अर्धा एकर टोमॅटोची बाग अाहे. टोमॅटोची तोडणी करुन बाजारामध्ये पाठविण्यास परवड नसल्याने गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये सुमारे दोन टन टोमॅटो फेकून दिले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com