भामा आसखेडमधून रब्बीतील दुसरे आवर्तन

भामा आसखेडमधून रब्बीतील दुसरे आवर्तन

आंबेठाण, ता.१३ : भामा आसखेड (ता.खेड) धरणातून चालू वर्षीच्या रब्बी हंगामातील दुसरे आवर्तन भामा नदीपात्रात सोडण्यात आले आहे. सध्या हे आवर्तन एक आणि चार क्रमांकाच्या दरवाजातून ९३० क्युसेसने सोडण्यात आले आहे.
भामा आसखेड हे खेडच्या पश्चिम भागात भामा नदीवर उभारलेले मातीचे धरण आहे. चालू वर्षी पुरेसा पाऊस झाल्याने धरण १०० टक्के भरले होते. या धरणाची पाणीसाठवण क्षमता ८.१४ टीएमसी इतकी आहे.धरणात सध्या एकूण पाणीसाठा ६.५९ टीएमसी असून उपयुक्त पाणीसाठा ६.११ टीएमसी आहे. टक्केवारीत हा पाणीसाठा ७९.७२ टक्के पाणीसाठा शिल्लक असून मागील वर्षी हा साठा ८२.९५ टक्के होता. मागील वर्षात धरण क्षेत्रात १२७७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
भामा नदीवर आलेगाव पागा पर्यंत असणारे १८ बंधारे भरण्यासाठी हे आवर्तन सोडण्यात आले आहे. सांडव्याच्या चार पैकी दोन दरवाजातून हे पाणी सोडण्यात आले असून त्यासाठी दरवाजे एक फुटाने वर उचलण्यात आले आहे. खेड, शिरूर, दौड आणि हवेली तालुक्यातील काही भागाला या आवर्तनाचा फायदा होणार आहे.
भामा आसखेड धरण प्रकल्पाचे उपविभागीय अधिकारी तुळशीदास आंधळे, शाखा अभियंता नीलेश घारे-देशमुख आणि कालवा निरीक्षक वसंत ढोकरे यांनी माहिती दिली आहे.

02534

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com