ध्वनिप्रदुषामुळे परीक्षार्थींची एकाग्रता भंग

ध्वनिप्रदुषामुळे परीक्षार्थींची एकाग्रता भंग

आळंदी, ता.११ : फेब्रुवारी मार्च महिना दहावी बारावीच्या परीक्षांचा काळ असतो. या कालावधीत विद्यार्थी अभ्यासात दंग असतात. मात्र, सततच्या लग्नातील बॅण्ड, ध्वनिक्षेपकांचा कानी पडणाऱ्या आणि कानठळ्या बसणाऱ्या आवाजामुळे परीक्षार्थींच्या अभ्यासात व्यत्यय येत असल्याचे चित्र आहे. आळंदी दिघी पोलिस लग्नकार्यातील मिरवणुका आणि ध्वनिप्रदुषणावर कारवाई कधी करणार, असा सवाल विद्यार्थी आणि पालक वर्ग करत आहेत.

सध्या दहावी बारावीच्या परीक्षा तोंडावर आल्या आहेत. विद्यार्थी अभ्यासात दंग आहेत. अभ्यासासाठी एकांत एकाग्रता हवी असते. मात्र सोबत लग्नांचा हंगाम सुरू आहे. आळंदी आणि परिसरात दररोज शेकडो लग्ने लागत आहेत. आळंदी परिसरातील चऱ्होली, वडमुखवाडी, चोविसावाडी, धानोरे, मरकळ, चिंबळी, कुरूळी भागात मंगलकार्यालये मोठी आहेत. यामुळे लग्नातील परणे, मिरवणुकाही धुमधडाक्यात होत आहे. आळंदीत तर एका मंगलकार्यालयात छोटीमोठी दहा पंधरा लग्ने आरामात होतात. सतत बॅण्ड, ताशा वाजवले जातात. परिणामी परीक्षार्थी मुलांना अभ्यासातील एकाग्रता भंग पावते. आळंदीत तर लग्नांना वेळकाळ नाही. दिवसभर कुठे ना कुठे लग्न सुरूच असते. अगदी रात्रीही लग्न लावली जातात.
ध्वनीप्रदुषणात अभ्यास करायचा तरी कधी अशी अवस्था परीक्षार्थींची झाली आहे. त्यातच अधूनमधून धार्मिक सप्ताह आयोजित केले जातात. त्यांचेही ध्वनिप्रदूषण असतेच. धार्मिक कार्यक्रम म्हणून पोलिस काणाडोळा करतात. तर लग्नांच्या आवाजाकडे अर्थपूर्ण तडजोड केलेली असते. मग तक्रार करायची कुठे असा प्रश्न पडतो. किमान फेब्रुवारी, मार्च या दहावी बारावीच्या परिक्षा कालावधीत तरी लग्न आणि धार्मिक कार्यक्रमांचे ध्वनिप्रदूषण दिघी आळंदी पोलिस रोखतील का असा सवाल विचारला जातोय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com