रसायनयुक्त पाण्यामुळे इंद्रायणी फेसाळली

रसायनयुक्त पाण्यामुळे इंद्रायणी फेसाळली

आळंदी, ता.२५ : येथील (ता. खेड) इंद्रायणी नदी रसायनयुक्त सांडपाणी सोडल्यामुळे पुन्हा फेसाळली. आठवड्यातून किमान दोनदा मोठ्या प्रमाणात रसायनयुक्त पाणी सोडल्याने नदी प्रदूषित होत आहे. या गंभीर प्रश्‍न कायमचा मिटविण्याची मागणी आळंदीकर तसेच माउलींच्या दर्शनासाठी येणारे भाविक करत आहेत.

राज्यसरकार असेल किंवा राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळ निवेदने घेऊन गप्प बसण्यापलिकडे काहीच कारवाई किंवा इंद्रायणी संवर्धनासाठी काम करत नसल्याचे चित्र आहे. परिणामी आळंदीत नागरिकांना आणि भाविकांना मात्र प्रदूषित पाण्याचा सामना करावा लागत आहे. राज्यभरातून येणाऱ्या भाविकांना घाणेरड्या पाण्यातच तीर्थस्नान करावे लागत आहे. शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न इंद्रायणीकाठच्या गावांमधे निर्माण झाला आहे
पिंपरी-चिंचवड महापिलिकेकडून लाखो रुपयांच्या निविदा जलपर्णी हटविण्यासाठी काढल्या जातात. दुसरीकडे चिखली कुदळवाडी भागातील येणारे सांडपाणी मात्र अडवण्यासाठी महापालिका काहीच करत नसल्याचे चित्र आहे. देहू तळेगाव कामशेत एवढेच काय आळंदी पालिकाही सांडपाणी थेट नदीत सोडत आहे. आठवड्यातून दोनदा अशी फेसाळलेली नदी पाहायची सवय आळंदीकरांना झाली आहे.
नदी संवर्धनासाठी कोट्यवधी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळविल्याचा डंका मिरविणाऱ्या पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतूनच दररोज लाखो लिटरचे सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करताच थेट इंद्रायणी पात्रात मिसळले जात आहे. .
03184

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com