नशीब बलवत्तर म्हणून महाराष्ट्रात परतलो सुखरूप 

बारामतीच्या अश्वगंधा पारडेने सांगितला मणिपूरमधील थरकाप उडविणारा अनुभव

नशीब बलवत्तर म्हणून महाराष्ट्रात परतलो सुखरूप बारामतीच्या अश्वगंधा पारडेने सांगितला मणिपूरमधील थरकाप उडविणारा अनुभव

बारामती, ता. ९ ः मणिपूरमधील हिंसाचाराने भयभीत वातावरणात आम्ही होतो. पुढे नेमके काय होईल, याची कल्पनाच येत नव्हती. या वातावरणामुळे मणिपूर सोडून शेजारील आसाममध्ये जावे लागले. इंटरनेट बंद असल्याने अधिकच अडचण आली. पण, नशीब बलवत्तर म्हणून पुन्हा महाराष्ट्रात सुखरूप परतलो. मूळची बारामतीची अश्वगंधा पारडे या विद्यार्थिनीने तिचा हा अनुभव कथन केला. पुण्यात परतल्यानंतर तिने घटनाक्रमाबद्दल माहिती दिली.

गरवारेची माजी विद्यार्थिनी इंफाळच्या नॅशनल स्पोर्ट्स विद्यापीठात शिकत आहे. तिची परिक्षा असतानाच हिंसाचार सुरू झाला. तिने सांगितले की, या परिस्थितीने लोकांनी आसाममध्ये स्थलांतर केले. मिळेल ते खाऊन कसेतरी दिवस काढले. आमच्या वसतिगृहासमोरच बॉम्बस्फोट झालेला पाहिला. नुसती आग दिसत होती. त्याने भयभीत झालो होतो. हिंसाचाराने बाहेर पडणे अशक्य होते. मात्र, नंतर एनएसजीचे कमांडर आल्यानंतर परिस्थिती निवळली.

राज्य शासनासह मुख्यमंत्र्यांनीही अडकलेले विद्यार्थी सुखरूप परत यावेत, यासाठी प्रयत्न केले. आम्हाला राज्यात परत आणण्यासाठी प्रयत्न केलेल्या प्रत्येकाचे आभार अश्वगंधाने मानले. पोलिस बंदोबस्तात आम्हाला विमानाने गुवाहाटी मार्गे मुंबईत आणले गेले.

मणिपूरमधील परिस्थितीत सुधारणा झाल्यावर येत्या २१ जून रोजी मला परीक्षा देण्यासाठी पुन्हा माणिपूरला जावे लागणार आहे. परिस्थिती निवळली तरच जाणे शक्य होईल, ऑनलाइन परिक्षा होणार नसल्याने तेथे जाण्याशिवाय पर्यायच नाही. मात्र, परिस्थितीनुसार या बाबत निर्णय घेईन.
- अश्वगंधा पारडे, विद्यार्थिनी, बारामती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com