
नाझरे धरणातील पाणी होतेय दूषित जलसंपदा विभागाचे नियम डावलून परिसरात गर्दी
जेजुरी, ता. १० : जेजुरीजवळील नाझरे धरणातील (मल्हारसागर) पाणी पिण्यासाठी वापरले जाते. येथे भाविक धरणाच्या काठावर धार्मिक विधी करण्यासाठी गर्दी करीत असून, त्यामुळे धरणातील पाणीसाठा दूषित होत आहे. जलसंपदा विभागाच्या उपसा सिंचन विभागाच्यावतीने कायदेशीर कारवाईचे फलक या ठिकाणी लावले आहेत. मात्र, नियम डावलून येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी होताना दिसत आहे.
येथे सध्या चारचाकी गाड्याही थेट धरणावर येत असतात. त्यामुळे येथील पाणी गढूळ होते. तसेच या ठिकाणी प्लास्टिकचे प्रदूषणही वाढत आहे. अनेकांनी या परिसरात दुकाने थाटली आहेत. येथे फलक लावूनही दुकानदार व भाविक त्याकडे दुर्लक्ष करीत राजरोसपणे धरणातील पाण्यात उतरत आहेत. येथे धरणात स्नान करणेही धोकादायक आहे. यापूर्वी अनेक दुर्घटना येथे घडल्या आहेत.
पाणी योजना अडचणीत
येथून जेजुरी परिसरातील अनेक गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. तथापि, येथील प्रदूषणामुळे पिण्याच्या पाण्याच्या अनेक योजना अडचणीत आल्या आहेत. धरणातील गाळ काढणेही आवश्यक आहेत. या बाबत जलसंपदा विभागाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी जेजुरीतील नागरिक करीत आहेत.
छायाचित्र- jejuri10p1,jejuri10p2
छायाचित्र-जेजुरी(ता.पुरंदर) ः जलसंपदा विभागाने लावलेल्या फलकाकडे दुर्लंक्ष करून होतात धार्मिक विधी jejuri10p3
Web Title: Todays Latest District Marathi News Jej22b00631 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..