नीरा डावा कालव्याच्या उन्हाळी आवर्तनाकडे डोळे

नीरा डावा कालव्याच्या उन्हाळी आवर्तनाकडे डोळे

निमगाव केतकी, ता.२४ : सणसर (ता. इंदापूर) भागात कालवा दोन वेळा फुटल्यामुळे नीरा डावा कालव्याच्या उन्हाळ्यातील आवर्तनाला उशीर झाला. यामुळे तालुक्यातील वरकुटे खुर्द, फाटा क्रमांक ५७ व ५९ या टेलच्या भागातील उभी पिके पाणी न मिळाल्याने जळू लागली आहेत. यामुळे तातडीने आवर्तन सोडण्याची मागणी शेतकरी हतबल झालेले शेतकरी करीत आहेत.
पाण्याची पाळी लांबल्यामुळे टेलच्या भागातील शेतकऱ्यांची ऊस, मका, कडवळ चारा पिके, फळबागा पाण्या अभावी जळू लागल्याने नीरा डावा कालव्याचे पाणी कधी मिळणार याकडे शेतकरी डोळे लावून बसला आहे.
वरकुटे खुर्द येथील शेतकरी आबा राजाराम हेगडे म्हणाले, फाटा क्रमांक ५९ वरील शेतकऱ्यांना मार्चमध्ये पाणी मिळाले होते. वास्तविक पाटबंधारे खात्याच्या नियमाप्रमाणे ४५ दिवसानंतर पाण्याची पाळी मिळायला पाहिजे. परंतु दोन महिने होत आले तरी अद्याप पाणी न मिळाल्याने आमची उभी पिके सुकू लागली आहेत. पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न देखील बिकट बनला आहे. त्यामुळे येत्या चार दिवसात पाणी न मिळाल्यास आतापर्यंत जगवलेली सर्व पिके जळून खाक होतील. त्यामुळे पाटबंधारे विभागाने तातडीने या भागाला आवर्तन सुरू करावे.

पाण्याची पाळी पाच मे रोजी मिळायला हवी होती. मात्र, महिना संपत आला तरीही अद्याप पाणी मिळाले नाही. दरवर्षी नियमाप्रमाणे पाणीपट्टी भरतो. यंदाही भरलेली आहे. मात्र पाण्याला खूप उशीर झालेला आहे. वास्तविक पाहता शेतकऱ्यांना उन्हाळ्यातच वेळेवर पाण्याची मोठी गरज असते. आवर्तन चार दिवस पुढे गेले तरी पिकांना फार मोठा फटका बसतो. आवर्तन वीस दिवस लांबले आहे. त्यामुळे पिके जळण्याच्या मार्गावर आहेत.
आत्माराम शेंडे, शेतकरी

वरकुटे खुर्द (ता. इंदापूर) : नीरा डावा कालव्याचे पाण्याचे आवर्तन न मिळाल्याने जळत असलेले पीक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com