
लागवडीचा ऊस वादळी वाऱ्यामुळे भुईसपाट
कुरकुंभ, ता. १५ : शेतकऱ्यांनी चालू हंगामातील ऊस लागवडीसाठी राखीव ठेवलेला बेण्यासाठीचा ऊस वादळीवाऱ्याने भुईसपाट झाला आहे. त्याला उंदरांचा प्रादुर्भाव व फणशा फुटण्याचा धोका संभवतो. त्यामुळे ऊस लागवडीचा खर्च वाढणार आहे. दौंड तालुक्यात वादळीवाऱ्यामुळे नुकसान झालेल्या उसाचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
दौंड तालुक्यातील मोठयासंख्येने शेतकरी आजही खर्च वाचविण्यासाठी पारंपरिक पध्दतीने ऊसलागवड करतात. त्यासाठी ८६०३२, २६५ इत्यादी उसाच्या बेण्याची निवड केली जाते. त्याची रोपे खरेदीसाठी जास्त पैसे खर्च होत असल्याने शेतकरी लागवडीसाठी चांगल्या प्रतीचे ऊसबेणे वापरतात. बेण्यासाठी ठेवलेल्या उसाला साखर कारखाना व गुऱ्हाळाच्या बाजारभावापेक्षा चांगले पैसे मिळतात. यावर्षी साखर कारखान्यांने टनाला २५०० पासून ३००० पर्यंत बाजारभाव देतील. तर बेण्यासाठी ऊस पाच ते सहा गुंठा दराने जाण्याची शक्यता आहे. चांगला ऊस असेल तर एका गुंठ्यात एक ते दीड टन ऊस निघतो. त्यामध्ये एकर उसाची लागवड होत असल्याने शेतकऱ्याला पाच ते नऊ हजारापर्यंत बेण्यासाठी खर्च होतो. तर उसाची रोपे पारंपरिक पद्धतीने लावल्यास एक एकराला सरासरी साडेसात ते आठ हजार रुपये लागतात. एका ऊस रोपाची किमत अडीच ते तीन रुपये आहे. त्यानुसार या ऊस लागवडीसाठी वीस ते पंचवीस हजार रुपये खर्च येतो.
कारखाना व गुऱ्हाळापेक्षा मिळतात जास्त पैसे
शेतकरी ऊसलागवडीसाठी चांगल्या प्रतीच्या उसाचा वापर करून खर्च कमी करण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी शेतकरी ज्यांच्याकडे बेणे योग्य ऊस असेल त्याची निवड लागवडीसाठी करतात. तर बेण्याच्या उसाचे कारखाना व गुऱ्हाळापेक्षा जास्त पैसे मिळत असल्याने अनेक शेतकरी बेणे विक्रीसाठी दहा ते बारा महिने कालावधीचा ऊस राखीव ठेवतात.
Web Title: Todays Latest District Marathi News Kur22b00414 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..