
सरकारने कांदा खरेदी करावा : फुलवडे
महाळुंगे पडवळ, ता. ११ : “कांदा पिकाचे या वर्षी चांगले उत्पादन झाले आहे. सध्या मिळत असलेल्या बाजारभावातून उत्पादन खर्चही वसूल होत नाही. त्यामुळे राज्य शासनाने बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत कांदा खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा,’’ अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव फुलवडे यांनी दिली.
साकोरे-महाळुंगे पडवळ (ता. आंबेगाव) गावच्या सीमेवर असलेल्या श्री शिवाई शिवबाबा भंडारा उत्सवानिमित्त फुलवडे यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी साकोरे ग्रामपंचायत उपसरपंच श्रुतिका गणेश गाडे, सोसायटीचे माजी अध्यक्ष भानुदास आवटे, संदीप गाडे, सदाशिव गाडे, सेवानिवृत्त वनविभागाचे अधिकारी बळिराम चिखले, अॅड. उत्तम चिखले, दिलीप काळे, अभियंता कल्याण चिखले उपस्थित होते.
“रब्बी हंगामातील कांद्यासाठी सुरुवातीपासून मोठा भांडवली खर्च करावा लागला. बदलत्या हवामानावर मात करून कांदा पीक घेतले. कांदा विक्री करण्याची वेळ आल्यावर बाजारभाव कमी झाले, त्यामुळे अडचणीत आले आहेत,’’ असे विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष गणेश गाडे यांनी सांगितले.
“तत्कालीन मुख्यमंत्री (कै.) विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाने बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत कांदा खरेदी केला होता, याच धर्तीवर राज्य सरकारने कांदा पिकाची खरेदी करून शेतकऱ्याना न्याय द्यावा. याबाबत सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची शेतकऱ्यांसमवेत लवकरच भेट घेणार आहे,’’ असे गणपतराव फुलवडे यांनी सांगितले. नितीन चिखले यांनी सूत्रसंचालन तर राजेंद्र आवटे यांनी आभार मानले.
Web Title: Todays Latest District Marathi News Mpw22b00481 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..