भात उत्पादक शेतकरी पुन्हा संकटात
हिर्डोशी, ता. २४ : भोर तालुक्यातील पश्चिम भागात भात काढणीला सुरुवात झाली असून, लक्ष्मीपूजन आणि भाऊबीज या दिवशी पडलेल्या पावसाने भात पिकाचे नुकसान झाले आहे. आधीच रोगांचा प्रादुर्भाव व आता पावसाच्या कृपादृष्टीमुळे भात पिकांमुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडल्याने हतबल झाले आहेत. शासनाकडून नुकसान भरपाईची मागणी होत आहे.
भोर तालुक्यात भात हेच प्रमुख पीक असून, भात पिकावर शेतकऱ्याचे वर्षभराचे आर्थिक गणित अवलंबून असते. भात पोसण्याच्या अवस्थेत असताना रोगाच्या प्रादुर्भावाने भात पिकाचे मोठे नुकसान झाले. पश्चिम भागातील हिर्डोशी, महुडे, वेळवंड, मळे भुतोंडे खोऱ्यात सध्या भात काढण्याची लगबग सुरू आहे. त्यातच पावसामुळे कापून टाकलेले भात भिजल्याने खराब झाले आहे. काही ठिकाणी भात आडवे झाले आहे, तर काही ठिकाणी दाणे झडून गेल्याने उत्पादन घट होणार आहे. हिर्डोशी येथील शेतकरी सीताराम धामुनसे, धोंडिबा मालुसरे, बबन धामुनसे, शिवाजी धामुनसे आदी गावातील शेतकऱ्यांचे कापलेले भात भिजले आहे, तर भागातील बऱ्याच भात पिकांचे रोगांमुळे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी माजी उपसरपंच धोंडिबा मालुसरे व ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब धामुनसे यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

