संपूर्ण ढापे न बसविल्याने पाणी जातये वाहून
नीरा नरसिंहपूर, ता. १ : सराटी, नरसिंहपूर (ता. इंदापूर) येथील नीरा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांना ढापे टाकून पाणी अडवण्यात येत आहे. मात्र, संपूर्ण बंधाऱ्यावर ढापे न टाकल्याने पाणी वाहून जात आहे. भविष्यात टंचाईचा सामना करावा लागणार असल्याची चिंता इंदापूर व माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
शासनाच्या निर्देशानुसार प्रत्येक वर्षी ऑक्टोबर महिन्याच्या १८ तारखेपर्यंत बंधाऱ्यांना ढापे टाकून पाणी अडवण्यात येत असते. परंतु नोव्हेंबर महिना उजाडला तरी पाणी न अडवले नसल्याने वाहून जात आहे.
गिरवी बंधारा दुरुस्तीअभावी यावर्षी रिकामाच राहण्याची शक्यता आहे. यासंदर्भात ‘सकाळ’मध्ये बातमी प्रसिद्ध झाल्याने त्याची दखल जलसंपदा विभागाने घेऊन ढापे टाकण्यास सुरुवात केली आहे. यासंदर्भात ‘सकाळ’मध्ये ‘भीमा, नीरा नदीवरील बंधाऱ्यांना ढापे टाकण्याची मागणी, नागरिकांना बसणार फटका’, या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध झाली होती. त्याची दखल जलसंपदा विभागाने घेऊन नरसिंहपूर व सराटी बंधाऱ्यांना ढापे टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सकाळचे आभार मानत आनंद व्यक्त केला आहे.
अतिवृष्टीमुळे नीरा नदीवरील गिरवी बंधाऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. बंधाऱ्याचा एका बाजूचा भराव पाण्याच्या रेट्यामुळे चौथ्यांदा वाहून गेला आहे. त्याच्या दुरुस्तीसाठी एक कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. परंतु त्याच्या दुरुस्तीचे काम अद्यापही सुरुवात करण्यात आलेली नाही. त्यामुळे यावर्षीही बंधारा रिकामाच राहण्याची शक्यता आहे.
05175
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

