
भात पिकांच्या रोपवाटिकेला पोखरीत पावसामुळे जीवदान
फुलवडे, ता. २५ : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील पोखरी, चिखली, जांभोरी आदी गावांमध्ये गुरुवार व शुक्रवारी
(ता. २४) पडलेल्या मुसळधार पाऊस पडला. यामुळे भात पिकांच्या रोपवाटिकेला जीवदान मिळाले. पावसाच्या जोरदार सरींमुळे दिलासा मिळाला असल्याचे शेतकरी राघू इष्टे व सोमा ढवळा बेंढारी यांनी सांगितले.
आंबेगाव तालुक्यात भात पिकाचे ५१०० हेक्टर एवढे क्षेत्र आहे. यात इंद्रायणी, रायभोग, खडक्या, रायभोग या वाणांची लागवड केली जाते. भात रोपे टाकल्यावर पावसाने बरेच दिवस दडी मारल्याने रोपे करपायला लागली होती. परंतु दोन दिवसांच्या पावसामुळे भात रोपांची उगवण चांगली झाल्याने शेतकरी सुखावला आहे. या भागात काही शेतकरी यंत्राद्वारे भात लागवड करत आहे. यावर्षी अशा प्रकारच्या लागवडीत वाढ होत असल्याचे दिसत आहे. तसेच सगुणा राईस टेकनिक (एसआरटी) या पध्दतीत भात लागवड गादी वाफ्यावर अंतरावर केली जाते. परंतु याची पुनर्लागवड केली जात नाही. भात पिका शिवाय नाचणी, वरई, सावा, कारळा तसेच काही प्रमाणात भुईमूग ही पिकेही या भागात घेतली जातात.
01312
Web Title: Todays Latest District Marathi News Phe22a00552 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..