आंबेगावच्या पश्‍चिम भागात
पंचनामे करण्याची मागणी

आंबेगावच्या पश्‍चिम भागात पंचनामे करण्याची मागणी

फुलवडे, ता. २० : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील आहुपे, भीमाशंकर, पाटण खोऱ्यातील अनेक गावांमध्ये अवकाळी पाऊस पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करावेत, अशी मागणी जांभोरी ग्रामविकास फाउंडेशनचे अध्यक्ष पुनाजी पारधी यांनी केली.
निगडाळे, जांभोरी, तळेघर, फलोदे, चिखली, पोखरी, आहुपे, तिरपाड, असाणे आदी गावांमध्ये गेली दोन-तीन दिवस विजेच्या कडकडाटांसह झालेल्या पावसाने व गारपिटीमुळे जनावरांची वैरण, भाताचा पेंढा भिजून गेला. सध्या भात शेतीसाठी मशागतीची कामे सुरू असल्याने शेत भाजणीसाठी जमविलेला पालापाचोळा, गोवऱ्या, राब भिजून गेला आहे. तर, हिरड्याच्या झाडांचा मोहोरदेखील पडला आहे.
फलोदे येथील सीताराम तुकाराम मुदगुण यांची जनावरे रानात चरत असताना विजेच्या कडकडाटासह पाऊस पडला. त्यावेळी एका बैलाचा वीज अंगावर पडल्याने मृत्यू झाला. प्रशासनाने या भागातील पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com