
वाल्हे येथे पालखीतळाचा आढावा
वाल्हे, ता. ६ : वाल्हे येथे २७ जून रोजी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मुक्कामी विसावणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नुकतीच पालखी सोहळा कमिटी व पुरंदरमधील प्रशासनाने पालखीतळाला भेट दिली. या प्रसंगी आमदार संजय जगताप, पालखी सोहळ्याचे अभय टिळक, बाळासाहेब चोपदार, मारुती कोकाटे, उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार रूपाली सरनोबत, जेजुरीचे पोलिस निरीक्षक उमेश तावसकर, नीलेश अवसरमोल, त्रिंबक भुजबळ, संदेश पवार, बबनराव चखाले, प्रा. संतोष नवले आदी उपस्थित होते.
पालखीचा पुणे जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम वाल्हे-सुकलवाडी नजीक असलेल्या पालखीतळावर होतो. हा पालखीतळ गेल्या अनेक वर्षांपासून अडचणींचा सामना करत आहे. पालखीतळावर जाण्यासाठी असलेला जुना मार्ग पूर्ववत करावा. त्याला पर्याय म्हणून वाल्हे पालखीतळावरून पालखी बाहेर जाण्यासाठी अजून एक नवीन प्रवेशद्वार तयार करावे. तसेच पालखी आतमध्ये येण्यासाठी असलेला रेल्वेमार्गाबाबत रेल्वे अधिकाऱ्यांशी बोलून योग्य तो मार्ग काढावा, अशी मागणीदेखील पालखी सोहळा कमिटीच्या वतीने करण्यात आली. सरपंच अमोल खवले यांनी आभार मानले.
वैष्णवांचा मेळा तब्बल दोन वर्षांनंतर वाल्मिकनगरीत विसावणार असल्याने या सोहळ्यात येणाऱ्या वैष्णवांना कोणत्याही प्रकारच्या अडचणींना सामोरे जायला लागू नये तसेच त्यांना देण्यात येणाऱ्या सोई-सुविधांमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरचा जाणवू नये, यासाठी जिल्हा प्रशासनासोबतच तालुका प्रसासनदेखील कसोशीने प्रयत्न करेल, तसेच रेल्वेच्या प्रश्नाबाबत खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू.
- संजय जगताप, आमदार
Web Title: Todays Latest District Marathi News Pne22c59358 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..