खडकवासला कालव्यातून दुसरे आवर्तन सोडा

खडकवासला कालव्यातून दुसरे आवर्तन सोडा

शेटफळगढे, ता.२१ : इंदापूर तालुक्यातील खडकवासला कालव्याला शेती सिंचनासाठी सोडण्यात आलेले उन्हाळी हंगामातील पहिले आवर्तन बंद होऊन जवळपास ३० दिवसांचा कालावधी लोटला आहे. अशातच सध्या एप्रिल महिना संपत आल्याने उन्हाची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विहिरी व कूपनलिकांच्या पाणी पातळीत घट झाली आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्‍यातील शेती सिंचनासाठी खडकवासला कालव्यातून उन्हाळी हंगामातील दुसरे आवर्तन सोडण्यात यावे, अशी मागणी इंदापूरमधील शेतकऱ्यांमधून होत आहे.
खडकवासला प्रकल्पात यावर्षी शंभर टक्के पाणीसाठा झाला होता. अशातच सध्या आज अखेर खडकवासला प्रकल्पात जवळपास ४० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामातील भुईमूग हे पिके चांगले आले आहे. तसेच सध्या शेतात उसाचे पीक देखील उभे आहे. या पिकांना सध्या उन्हामुळे मुबलक पाणी लागत आहे. मात्र जलसंपदा विभागाने अद्याप शेती सिंचनासाठी आवर्तन दिलेले जवळपास ३० दिवसांचा कालावधी लोटला आहे. अशातच सध्या उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे पिके तीन-चार दिवसालाच सिंचनाला येत आहेत. परंतु विहिरी व कूपनलिका यांचे पाणी कमी पडल्याने शेतकऱ्यांना आपली शेती सिंचित करण्यात अडचणी येत आहेत. याशिवाय कालव्याच्या लाभक्षेत्रात अनेक गावच्या पाणीपुरवठा योजनांच्या विहिरी आहेत. कालव्याला जवळपास ३० दिवस दिवस झाले तरी पाणी नसल्याने पाणी पुरवठ्याच्या विहिरींचे भूमिगत जलस्त्रोत आटल्याने गावच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे खडकवासला कालव्याला इंदापूर तालुक्यातील शेती सिंचनासाठी उन्हाळी हंगामातील दुसरे आवर्तन सोडावे,अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com