वीजपुरवठा सुरळीत 
करण्याची मागणी

वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी

शेटफळगढे, ता. १५ : सध्या खडकवासला कालव्याचे आवर्तन चालू आहे, अशा स्थितीत शेटफळगढे विद्युत केंद्रातून सुरळीत व पुरेशा दाबाने वीज पुरवठा होत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.
आजवर परिसरातील शेतकऱ्यांना उन्हाळ्यात शेती सिंचनासाठी पाणी उपलब्ध होत नसल्याने पाणी टंचाईला सामोरे जावे लागत होते. मात्र, आता शेती सिंचनाला उन्हाळ्यात वेळेवर खडकवासला कालव्याचे आवर्तन आले आहे. परंतु, शेती पंपांसाठी केला जाणारा वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याने व सतत चालू बंदचा विजेचा खेळ होत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांची शेती कालव्याला पाणी असूनही जळून जाण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये वीज विभागाच्या विरोधात नाराजीचे वातावरण आहे. वीज वितरण विभागाने शेतकऱ्यांच्या हितासाठी विद्युत केंद्रातून सुरळीत वीजपुरवठा सुरू करणे गरजेचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com