शिरूर तालुक्यात शेतकऱ्यांचे पावसामुळे नुकसान

शिरूर तालुक्यात शेतकऱ्यांचे पावसामुळे नुकसान

तळेगाव ढमढेरे, ता. ४ : शिरूर तालुक्यातील विविध गावांमध्ये अचानक झालेल्या वादळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचे वादळी पावसामुळे पॉलिहाऊस, झाडे, बागा व पिकांचे नुकसान झाले आहे.
वादळी वाऱ्याच्या नुकसानी विषयी खंडाळे येथील शिरूर तालुका अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे माजी अध्यक्ष सुनील हिंगे म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांच्या शेतमालाला बाजार भाव नसल्यामुळे सध्या शेतकरी आर्थिक अडचणी सापडला आहे. वादळी वाऱ्याने पॉलिहाऊससारख्या प्रकल्पाचे नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन पॉलिहाऊस उभारले आहे, अशा शेतकऱ्यांच्या प्रकल्पाचा बँकेने विमा उतरवणे गरजेचे आहे. कर्जाची परतफेड होईपर्यंत बँकेने प्रकल्पाचा विमा काढून नैसर्गिक आपत्तीपासून शेतकऱ्यांना वाचवावे. अशा प्रकल्पातील विमाविषयी बँकेने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे.’’ दरम्यान, शिरूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे वादळी वाऱ्यामुळे नुकसान झाले असून शासनाने त्वरित दखल घेऊन नुकसानीचे पंचनामे करावेत, अशी मागणी त्यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com