रोहित्राच्या वारंवार बिघाडामुळे नागरिक हैराण

रोहित्राच्या वारंवार बिघाडामुळे नागरिक हैराण

ओतूर, ता.२६ : येथील (ता.जुन्नर) गावठाणातील दस्तूरखान बाबा दर्ग्याजवळील रोहित्रात वारंवार बिघाड होत आहे. यामुळे वीज पुरवठा खंडित होऊन नागरिक, व्यवसायिक तसेच शेतकऱ्यांनाही नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ओतूर बाजारपेठ, सराफआळी, होळीचौक तसेच अर्ध्या गावठाणात वारंवार बत्ती गुल होते. यामुळे वीज पुरवठ्याचा प्रश्‍न समूळ मिटविण्यासाठी नवी रोहित्र बसविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.


महावितरणच्या भोंगळ कारभाराचा फटका सर्वसामान्य नागरिक, हॉस्पिटल, दुकानदार तसेच व्यावसायिकांना बसत आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यावर वीज कर्मचारी व अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क केल्यावरच खंडित वीज पुरवठा सुरळीत होतो. त्यामुळे या रोहित्रावर अवलंबून असलेले या परिसरातील नागरिक विजेच्या समस्येने हैराण झाले आहेत. विद्यार्थ्यांनाही विजेच्या समस्येचा सामना करावा लागत आहे.

याबाबत या परिसरातील ज्येष्ठ नागरिक म्हणतात, की वीज वितरण कंपनी नागरिकांकडून वीज बिल तत्परतेने वसूल करते. एखाद्या ग्राहकाने वेळेवर वीज बिलाचा भरणा केला नाही. तर तत्काळ त्याची वीज तोडली जाते. परंतु वीजपुरवठा सुरळीत करण्याकडे व तो अखंड सुरू ठेवण्याकडे महावितरण दुर्लक्ष करत आहे. या परिसरात सततचा वीजपुरवठा खंडित होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. दरम्यान, महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला तर तो होऊ शकला नाही.

ओतूर परिसरात वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी वाट पाहणे नित्याचे बनले आहे. वेळोवेळी तक्रारी करूनही महावितरणकडून दखल घेतली जात नाही. तक्रारीची दखल जर घेतली तर, तात्पुरती दुरुस्ती केली जाते. काही कालावधीनंतर रोहित्रात बिघाड होतो व पुन्हा खंडित वीज पुवठ्याच्या सामना करावा लागतो.
- देविदास तांबे, माजी अध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक संघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com