कांदा सडू लागल्याने डोळ्यात अश्रू

कांदा सडू लागल्याने डोळ्यात अश्रू

ओतूर,ता.२० : ओतूर (ता.जुन्नर) व परिसरातील गावामधील कित्येक शेतकऱ्यांचा चाळीत साठवणूक केलेला कांदा सडू लागला आहे. सध्या कांद्याला निच्चांकी बाजारभाव मिळत असल्याने उत्पादन खर्च ही मिळेनासा झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे.
ओतूर कृषी मंडल कार्यालयात अंतर्गत येणाऱ्या ओतूर, उदापूर, डिंगोरे, नेतवड, माळवाडी, बल्लाळवाडी, पिंपळगाव जोगा, कोळवाडी, वाटखळे, चिल्हेवाडी, पाचघर, आंबेगव्हाण, रोहोकडी व इतर गावात कांदा हे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण पिक उत्पादित केले जाते.या परिसरातील कांदा मार्च, एप्रिल महिन्यात काढणी करून शेतकरी आपला कांदा समाधानकारक बाजारभाव मिळेल या आशेवर चाळीत साठवणूक करून ठेवतो व हा कांदा पूना फुरसुंगी, रांगडा कांदा असे ही नावे असून कनेसर बियाण्यांचा कांदा ही टिकवण क्षमतेला चांगला असल्याचे आतापर्यंत कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी अनुभवले आहे. मात्र, यावर्षी अवकाळी पाऊस, खराब हवामान यामुळे जो कांदा चाळीत साठवणूक करून शेतकरी ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात विक्रीसाठी
काढतो. तोच कांदा चाळीत साठवणूक केलेला असून मे महिन्यातच चाळीत कांदा सडू लागल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.कांदा उत्पादक शेतकऱ्यांपुढे अचानकच कांदा सडू लागल्याचे संकट उभे राहिल्याने शेतकरी हतबल झाला आहे. एप्रिल व मेच्या हिटमध्ये कांदा खराब होऊन लागल्याने शेतकऱ्यांपुढे नवे संकट उभे राहिले आहे.

उदापूर येथील कांदा उत्पादक शेतकरी ज्ञानदेव छबूराव अमूप यांनी दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही कांदा चाळीत साठवणूक केला. मात्र, यावर्षी त्यांच्या कांदा चाळीतील कांदे सडून खाली काळे पाणी पडू लागल्यामुळे त्याने कांदाचाळ उघडून कांदे भरण्यास सुरूवात केली. त्यात दोन गाण्यातील कांदे सडून खराब झाल्याने ते निवडून इतर खराब कांदे फेकून देण्याची वेळ त्यांच्यावर आली. तसेच आता कांद्याला निच्चांकीच म्हणजे सात ते नऊ रुपये एक नंबर कांद्याला बाजारभाव मिळत आर्थिक फटका बसत आहे, असे कांदा उत्पादक शेतकरी व उदापूरचे माजी सरपंच प्रदीप अमूप व ज्ञानदेव अमूप यांनी व्यक्त केले आहे.

किलोला दहा रुपये अनुदान जाहीर करा
शासनाने चाळीत साठवणूक केलेल्या कांद्याला कमीत कमी पन्नास रुपये किलोला हमीभाव जाहीर करावा.तसेच सरकारने फेब्रुवरी ते मार्च महिन्यात विक्री केलेल्या कांद्याला किलोला ३.५ रुपये अनुदान जाहीर केले. मात्र त्यानंतर ही कांद्याचे बाजारभाव आजपर्यंत निच्चांकीच राहिले आहे. सरकारने एप्रिल व मे महिन्यात ही विक्री झालेल्या कांद्याला कमीत कमी दहा रुपये किलोला अनुदान जाहीर करावे, अशी मागणी कृषीउत्पन्न बाजार समितीचे संचालक तुषार थोरात, माजी जिल्ला परिषद सदस्य अंकुश आमले, बबन तांबे, मोहित ढमाले यांनी परिसरातील सर्व कांदा उत्पादक शेतकर्याच्या वतीने केली आहे.


04235

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com