वडापुरी, ता. २० : वडापुरी (ता. इंदापूर) परिसरामध्ये दोन-तीन वर्षापासून मोठ्या प्रमाणात शेतकरी गुलछडी बागाकडे वळाला होता. मात्र, यावर्षी वाढलेल्या पाण्याच्या कमतरतेमुळे व कमी झालेल्या दरामुळे शेतकरी बागा काढून टाकत आहेत.
इंदापूर तालुक्यात सध्या फुलांना बाजारभाव नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी फुलांच्या बागा काढून टाकत असल्याचे फुल उत्पादक शेतकरी अलीम शेख यांनी सांगितले. यंदा यात्रा हंगाम व लग्नाच्या हंगामात फुलांना चांगला बाजार भाव मिळालाच नाही.
फुलांची तोडणी करून ती फूल बाजारपेठ पर्यंत घेऊन जाणे, वाहतुकीचा खर्च देखील वसूल होत नसल्याने शेतकऱ्यांनी फुलांची तोडणी थांबवली आहे. फुलांच्या शेतासाठी महागडी खते ,औषधे, ठिबक सिंचन यासाठी मोठ्या प्रमाणात केलेल्या खर्च सुद्धा निघत नसल्याने अडचणीत सापडला आहे. एक किलोच्या गुलछडीच्या फुलाच्या ढिगाऱ्याला ६० ते ७० रुपये किलो भाव मिळत आहे. अर्ध्या एकरात दोन ते तीन ढिगारे निघत आहे तर फुले तोडण्यासाठी लागणारा मजुरांचा खर्च, खताचा खर्च, औषधांचा खर्च तोडणीचा खर्च व बाजारपेठेपर्यंत नेण्याचा खर्च याचा विचार केला तर काहीही परवडत नसल्याने सध्या फूल उत्पादक शेतकरी अडचणीत आला.
01822
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.