मोदी सरकारच्या धोरणामुळे
अर्थव्यवस्था रसातळाला

मोदी सरकारच्या धोरणामुळे अर्थव्यवस्था रसातळाला

वाल्हे, ता. २० : ‘‘केंद्र सरकारमध्ये गेली नऊ वर्षे सत्तेवर असलेल्या भाजपच्या कार्यकाळात नरेंद्र मोदी सरकारच्या जनविरोधी धोरणामुळे देशातील सर्वसामान्य जनता महागाई, बेरोजगारी व विषमतेच्या खाईत लोटली जात आहे. देशाची अर्थव्यवस्था पार रसातळाला गेली आहे. एकूण लोकशाही व्यवस्था धोक्यात आणली जात आहे. अशा परिस्थितीत हुकूमशाही पद्धतीचे निर्णय घेणाऱ्या आणि जनविरोधी धोरणे राबविणाऱ्या भाजपला सत्तेतून हद्दपार करणे, हाच एकमेव पर्याय आहे,’’ असे मत भारतीय कम्युनिष्ट पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड. फत्तेसिंग पवार यांनी व्यक्त केले.
भारतीय कम्यूनिस्ट पक्षाच्या वतीने ‘भाजप हटाव-देश बचाव’ ही देशव्यापी जनजागरण मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत वाल्हे (ता. पुरंदर) येथे बैठक झाली. त्यावेळी अॅड. पवार हे बोलत होते. याप्रसंगी सरपंच अमोल खवले, माणिक महाराज पवार, ज्ञानोबा भुजबळ, हरिभाऊ पवार, शिवाजी पवार, अविनाश चव्हाण आदी उपस्थित होते.
यावेळी पक्षाचे जिल्हा सचिव अरविंद जक्का म्हणाले, ‘‘समता, धर्मनिरपेक्षता, संविधानिक लोकशाहीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने ही देशव्यापी जनजागरण मोहीम सुरू केली आहे. दलित-अल्पसंख्याकांवर अन्याय अत्याचार वाढले, पत्रकारांवरील हल्ले वाढले. नोटाबंदीचे नाटक करण्यात आले. बेरोजगार तरुणांची क्रूर चेष्टा केली. महिलांवरसुद्धा कमालीचे अत्याचार वाढले. कॉर्पोरेट उद्योगाला खैरात वाटणारे हे सरकार पायउतार होणे आवश्यक आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com