
जिल्ह्यामध्ये ११ मे रोजी फेरफार अदालतीचे आयोजन
पुणे, ता. ९ : जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये मंडळ स्तरावर ११ मे रोजी फेरफार अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. फेरफार नोंदी प्रलंबित असलेल्या व्यक्तींनी संबंधित मंडळाच्या मुख्यालयात होणाऱ्या फेरफार अदालतीमध्ये कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी केले आहे.
दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी फेरफार अदालतीचे मंडळ स्तरावर आयोजन करण्यात येते. नागरिकांच्या प्रलंबित साध्या, वारस, तक्रारी फेरफार नोंदी निकाली काढण्यात येतात. जिल्ह्यात ९ मेअखेर मुदत पूर्ण झालेल्या १४ हजार १३४ नोंदी प्रलंबित आहेत. या नोंदीमध्ये प्रामुख्याने साध्या, वारस, तक्रार व मुदत पूर्ण झालेल्या नोंदी निकाली काढाव्यात. या संदर्भात उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांनीही काही फेरफार अदालतीला उपस्थित राहावे, अशा सूचना देण्यात आल्याचे उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61828 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..