
समाविष्ट गावांना पाणीपुरवठ्याची जबाबदारी महापालिकेचीच : आबा बागुल
समाविष्ट गावांना महापालिकेने
पाणीपुरवठा करावा : बागूल
पुणे, ता. ११ : समाविष्ट २३ गावांमधील सोसायट्यांमध्ये पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांच्या नावाखाली जबाबदारी झटकता येणार नाही, असे पत्र काँग्रेसचे गटनेते आबा बागूल यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना बुधवारी दिले.
बांधकाम व्यावसायिक हे सध्या सोसायट्यांना पाणीपुरवठा करतील, असे प्रतिज्ञापत्र पुणे महापालिकेने उच्च न्यायालयात सादर केले आहे. मात्र ते चुकीचे आहे. बांधकाम व्यावसायिकांनी लिहून दिले, या नावाखाली जबाबदारी झटकता येणार नाही. बांधकाम व्यावसायिक इमारत बांधून निघून जातात. मात्र, तेथील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. समाविष्ट २३ गावामधील नागरिकांना महापालिकेनेच पाणीपुरवठा करावा, तो समान पाणीपुरवठा योजनेतून किंवा अन्य स्रोतांतून कसा करायचा याची जबाबदारी महापालिकेची आहे. यामुळे या गावांमधील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळालेच पाहिजे, ही काँग्रेस पक्षाची भूमिका असल्याचे या पत्रात नमूद केले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62545 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..