
केंद्राच्या शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत करा अर्ज
पुणे, ता. ३० : राज्य उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेत (१२ वी) तुम्ही सर्वाधिक गुण प्राप्त केले असतील आणि पदवी अभ्यासक्रमालाही प्रवेश घेतला असेल तर तुम्ही केंद्र सरकारच्या सेंट्रल सेक्टर शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरला आहात. राज्यातील पहिल्या सात हजार ४१७ विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार असून, ३१ ऑगस्ट पर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे.
उच्च शिक्षण संचालकांनी या संबंधीचे पत्रक प्रसिद्ध केले असून, सर्व महाविद्यालये, शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठांना त्यांच्या स्तरावर कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहे. विद्यार्थ्यांनीही योजनेची माहिती घेत नवीन मंजुरी किंवा नूतनीकरणासाठीही अर्ज करणे गरजेचे आहे. सर्व प्रकारच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी ही योजना लागू असून, पदविका (डिप्लोमा) किंवा पदव्युत्तर पदविकेच्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. यामध्ये गुणानुक्रमाच्या आधारे विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे.
पात्रता व अटी
- अर्जदार इतर कोणत्याही शिष्यवृत्तींचा किंवा स्टायपेंडचा लाभार्थी नसावा
- पालकांचे वार्षिक उत्पन्न ४.५ लाखापेक्षा जास्त नसावे
- अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना चौथ्या वर्षापर्यंत तर इतर अभ्यासक्रमांना पाच वर्षांपर्यंत शिष्यवृत्ती मिळेल
कसा करावा अर्ज
- अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करता येईल
- अर्जाच्या प्रती आवश्यक त्या कागदपत्रांसह महाविद्यालयांत जमा कराव्यात
- महाविद्यालयांनी विद्यापीठ किंवा शिक्षण संचालनालय कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवावा
संकेतस्थळ
https://scholarships.gov.in/
Web Title: Todays Latest Marathi News Pne22d84960 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..