
‘काही नाही होत...’ वृत्ती सोडा
विनोबा भावे यांनी गीतेवर प्रवचने देताना म्हटले आहे, ‘कर्मयोगी कर्मातच आनंद मानणारा असल्यामुळे सदैव कर्म करतच राहतो. कर्मयोगी स्वयंतृप्त असतो. तरीही कर्म केल्याशिवाय राहत नाही. कर्माच्या शिडीवर चढून शिखर गाठले तरी कर्मयोगी शिखर गाठल्यावरही ही शिडी सोडीत नाही.’ आज प्रशासनात असलेल्या विविध पदावरील अधिकाऱ्यांनी हा उपदेश लक्षात ठेवणे गरजेचे आहे. आपल्याला नेमून दिलेले काम व्यवस्थित होत नसेल व ते पूर्ण झाल्यावर त्याचा समाजाला काही फायदाच नसेल तर आपलं कुठे तरी चुकतं हे ध्यानात ठेवावं. ‘काही नाही होत...’ ही वृत्ती सोडा. सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडीमुळे दररोज वाहनचालकांना होणारा मनस्ताप पाहता त्यांच्या संयमाचा बांध फुटण्यापूर्वीच प्रशासनाने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. याबाबत आपले अनुभव व सूचना नावासह editor.pune@esakal.com या मेलवर किंवा ८४८४९७३६०२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर कळवा.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22d85149 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..