
ग्राहक आयोगाने फेटाळला तक्रारदारांचा नुकसान भरपार्इ अर्ज
पुणे, ता. २० : कैलास-मानस सरोवर यात्रेत चांगली सेवा न दिल्याने टुरसाठी घेतलेले जादाचे पैसे आणि नुकसान भरपार्इ मिळण्यासाठी तक्रारदार पर्यटकांनी केलेला अर्ज अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने फेटाळून लावला. आयोगाचे अध्यक्ष जे. व्ही. देशमुख, सदस्य शुभांगी दुनाखे, अनिल जवळेकर यांनी हा निकाल दिला.
सदाशिव पेठेतील शिल्पा ट्रॅव्हल्सच्या विरोधात कात्रज येथील रहिवासी अनिल आणि आरती कांदे यांनी ही तक्रार दिली होती. तक्रारदार यांनी ट्रॅव्हल्स कंपनीमार्फत २२ जून ते पाच जुलै २०१८ दरम्यान कैलास मानस सरोवराच्या यात्रेचे बुकिंग केले होते. त्यासाठी एकूण एक लाख ८३ हजार ५०० रुपये कंपनीला दिले होते. मात्र कंपनीने ७० ऐवजी १०३ पर्यटकांना नेले. प्रवाशांचा विमा काढला नाही. प्रत्येक प्रवाशांकडून त्याची स्वतंत्र रक्कम स्वीकारली. प्रवासी व्यवस्था चांगली नव्हती. पॅकेजमध्ये असल्याप्रमाणे सुविधा पुरविल्या नाहीत, अशी तक्रार केली होती. यात्रेसाठी घेतलेले जादाचे पैसे परत करावेत. नुकसान भरपार्इ म्हणून एक लाख ४० हजार रुपये द्यावेत व तक्रारखर्चापोटी २० हजार रुपये देण्याची मागणी केली होती. सुविधा न पुरविल्याचे सबळ पुरावे तक्रारदार यांनी सादर केले नाहीत.त्यामुळे तक्रार सबळ पुराव्यानिशी सिद्ध केली नाही, असे आयोगाने आदेशात नमूद केले आहे. कंपनीतर्फे प्रशांत देशपांडे यांनी आपली बाजू मांडली.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22f87903 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..