
आठ तालुक्यातील शाळांना तीन दिवस सुटी
पुणे, ता. १३ ः जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जुन्नर, खेड, आंबेगाव, मावळ, मुळशी, हवेली, भोर आणि वेल्हा या आठ तालुक्यातील शाळांना उद्यापासून (ता. १४) शनिवारपर्यंत (ता. १६) जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर केली आहे.
गेल्या २४ तासांत या आठ तालुक्यांत मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. तसेच, जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ‘रेड ॲलर्ट’चा इशारा दिला आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली असल्याने त्याचा परिणाम शालेय विद्यार्थी यांना होऊ नये, यासाठी या आठ तालुक्यातील बारावीपर्यंतच्या सर्व शाळा १४ ते १६ जुलै असे तीन दिवस सुट्टी जाहीर केली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी काढले आहेत.
शाळांना तीन दिवस सुट्टी जाहीर केली असली तरी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करणे गरजचे आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.
या तालुक्यातील शाळा सुरु राहणार
इंदापूर, बारामती, दौंड, शिरूर आणि पुरंदर या तालुक्यातील शाळा सुरु राहणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22j27729 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..