‘स्वराज्य ३५०’
मोहिमेचे आयोजन

‘स्वराज्य ३५०’ मोहिमेचे आयोजन

पुणे, ता : १० ः छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत असल्याने ‘स्वराज्य ३५०’ या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीशिवछत्रपती राज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने पत्रकार परिषद घेत या संबंधी माहिती देण्यात आली.
पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती करत शनिवार (ता. ११) रोजी संजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मोहीम मार्गस्थ होणार आहे. या मोहिमेत ३५० दिवस महाराष्ट्रातील ३५० दुर्गांचा प्रवास करून तेथील पावन मृत्तिका (माती) व जल एकत्र करून याच जलाने २० जून २०२४ रोजी शिव छत्रपतींच्या मूर्तीला अभिषेक करण्यात येणार आहे.

काय काय होणार?
- शिव छत्रपतींच्या राजाभिषेकाच्या वर्षाचा प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत रायगडावर २ जून २०२३ रोजी करण्यात येणार
- संपूर्ण वर्षभरात देशाच्या प्रत्येक विद्यालयात, विद्यापीठात व्याख्याने, चर्चासत्रे व विविध स्पर्धांच्या माध्यमातून संपूर्ण जगभरात जागरण करण्यात येणार
- देशाच्या कानाकोपऱ्यात त्यांच्या स्थानिक भाषेमध्ये श्री शिवाजी महाराज व त्यांच्या दिग्विजयी मराठ्यांच्या पराक्रमाचा इतिहास पोचवण्यात येणार
- या राष्ट्राजागरणात्मक महोत्सवाची सांगता ९ जून २०२५ रोजी राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी कल्चरल सेंटरमध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते होईल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com