‘जलयुक्त शिवार’च्या दुसऱ्या टप्प्यासाठी १८७ गावांची निवड

‘जलयुक्त शिवार’च्या दुसऱ्या टप्प्यासाठी १८७ गावांची निवड

पुणे, ता.२२ ः जलयुक्त शिवार अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याची पुणे जिल्ह्यातील १८७ गावांत अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली. या गावांची नावे निश्‍चित करण्यात आली असून, कामांना जिल्हास्तरीय समितीने मंजुरी दिली असल्याचेही त्यांनी सांगितले.
दुसऱ्या टप्प्यातील या अभियानाच्या यशस्वितेसाठी मृद व जलसंधारणाच्या कामात सर्व सरकारी यंत्रणांनी लोकसहभागाला प्राधान्य देण्याबरोबरच निमसरकारी आणि खासगी संस्थांचाही सहभाग घेण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विभागांना केली आहे. जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत गाव निवडीसाठीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच झाली. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी हिंमत खराडे, उपजिल्हाधिकारी वनश्री लाभशेटवार, जिल्हा जलसंधारण अधिकारी सुजाता हांडे आदी उपस्थित होते. शिवाय जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी आणि गटविकास अधिकारी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी निवड करण्यात आलेल्या गावांमधील कामांचा कृती आराखडा सरकारच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे करावा. निवडलेल्या गावांमध्ये शिवारफेरी काढावी. पाणलोटनिहाय गावाचा आराखडा तयार करावा, असा आदेशही डॉ. देशमुख यांनी या वेळी दिला.

गावांची तालुकानिहाय संख्या
- हवेली --- १७
- शिरूर --- १७
- खेड --- २०
- मावळ --- १३
- जुन्नर --- १२
- आंबेगाव --- १३
- पुरंदर --- १४
- वेल्हे --- ०४
- मुळशी --- ०६
- भोर --- ०६
- बारामती --- ३९
- इंदापूर --- ११
- दौंड --- १५

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com