ग्रामपंचायतीकडून खासगी जागेवर अतिक्रमण
पुणे, ता. २३ : हिंजवडी येथील खासगी जागेवर ग्रामपंचायतीने अतिक्रमण केले असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी दिवाणी न्यायालयाने आदेश देऊनही ग्रामपंचायतीने अद्याप ते अतिक्रमण दूर केलेले नाही.
हिंजवडी येथे गट नं १४९ मधील आठ आर हे क्षेत्र प्रभा शांताराम जगताप यांच्या मालकीचे क्षेत्र आहे. या जागेवर ग्रामपंचायतीकडून बेकायदा परस्पर चौथरा आणि भिंत बांधण्यात आली. जागा मालकाने हे निदर्शनास आणून दिल्यानंतर ही ग्रामपंचायतीकडून कोणतीही कारवाई न झाल्याने त्यांनी मुळशी तहसीलदार यांच्याकडे तक्रार अर्ज दिला. त्यांनी ग्रामपंचायतीला हे बांधकाम काढून टाकण्याचे आदेश दिले. तरी आजपर्यंत अद्यापही कारवाई झालेली नाही. त्यामुळे जगताप यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे अर्ज देऊन हिंजवडी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आणि सदस्य यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. तसेच बेकायदा बांधकाम काढून टाकवे, अशी मागणी केली आहे.
यासंदर्भात हिंजवडी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक भारत पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘‘या संदर्भात न्यायालयीन वाद सुरू आहे. माझ्याकडे हिंजवडी ग्रामपंचयतीच्या ग्रामसेवकपदाचा तात्पुरता पदभार आहे.’’
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.